Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा एक सामान्य शो नाहो. या शोचे बरेच चाहते अगदी जगभरात आहेत. या शोशी संबंधित बर्याच पात्रांपैकी, दिलीप जोशी यांनी साकारलेला ‘जेठालाल’ आणि मुनमुन दत्ता हिने साकारलेली ‘बबिता जी’ या दोन पात्रांमध्ये पाहायला मिळणार गोड भांडण याने चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. शोच्या कथानकात ‘जेठालाल’ आणि ‘बबिता जी’ हे दोन आवडते कलाकार आता दिसणार नाहीत का?. ‘जेठालाल’ आणि ‘बबिता’ यांनी हा लोकप्रिय शो सोडला आहे का?, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या चाहत्यांना ‘जेठालाल’ आणि ‘बबिता जी’ याचा आवाज ऐकून १७ वर्षे झाली आहेत, परंतु सध्याच्या कथेत असलेल्या त्यांच्या अनुपस्थितीमुळे बर्याच चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. बर्याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यावर ही जोडी शोमधून बाहेर पडण्याचा विचार करीत आहे असा अंदाज आहे. ज्यांना हे माहित नाही, त्यांना हे कळू द्या की निर्मात्यांनी शोमध्ये ‘भूतनी’ ट्रॅक पुन्हा तयार केला आहे. सध्याच्या ट्रॅकमध्ये, ‘तारक मेहता’ चा बॉस त्याला आणि त्याची पत्नी ‘अंजली’ला ‘हॉलिडे होम’ मध्ये एक सुंदर सुट्टीसाठी पाठवतात.
‘तारक’ आपल्या बॉसला गोकुलधाम सोसायटीच्या लोकांना त्यात घेण्यास परवानगी देण्यास सांगतो. त्याच्या कामामुळे आणि कंपनीच्या नफ्यावर बॉस खूष असतो त्यामुळे, ‘तारक’ चा बॉस त्याच्याशी सहमत होतो. परंतु ‘तारक’ आणि गोकुलधाम सोसायटीच्या सदस्यांना हे माहित नव्हते की हॉलिडे होममध्ये भूत आहे आणि ‘तारक’ च्या बॉसने त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्याला पाठविलेले असते. सध्याच्या कथेत सुरू असलेल्या भयानक गोष्टींच्या दरम्यान, नेटकऱ्यांनी ‘जेठालाल’ आणि ‘बबिता जी’ यांची अनुपस्थितीची नोंद केली.
तनुज महासाबडे यांचे ‘अय्यर’ हे पात्र सध्याच्या ट्रॅकमधूनही गहाळ आहे. त्याच्या अनुपस्थितीत एक चर्चा झाली की दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता कदाचित या शोच्या बाहेर गेले असतील. एबीपीच्या अहवालानुसार, शोच्या प्रॉडक्शन हाऊसने पुष्टी केली आहे की ‘बबिता’ भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता अजूनही या शोचा एक भाग आहे. कथा अशा प्रकारे दर्शविली गेली आहे की ‘जेठालाल’ व्यवसायाच्या कामातून बाहेर आहे आणि ‘बबिता’ आणि ‘अय्यर’ महाबळेश्वरमध्ये सुट्टीवर गेले आहेत.





