लहान पडद्यावरील सगळ्यांना आवडता विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. २०१६ साली सुरु झालेल्या या कार्यक्रमाने सर्वांनाच खदखदून हसवले. पण काही कारणामुळे हा कार्यक्रम संथ झाला. तसेच या कार्यक्रमामध्ये दिसलेल्या सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशातच आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर व सुनील ग्रोव्हर दिसत आहेत. पण यामध्ये ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह या प्रोमोमध्ये दिसली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी चर्चा सुरु झाल्या. (bharti singh on kapil sharma show)
आतापर्यंत ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये भारती सर्वांचे मनोरंजन करताना दिसून आली होती. मात्र या पर्वामध्ये भारती दिसून न आल्याने चर्चा सुरु होत्या. अशातच आता भारतीने याबाबत खुलासा केला आहे.
भारतीने नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बद्दल भाष्य केले आहे. तेव्हा ती म्हणाली की, “कपिलचा शो जॉइन करण्याचा सध्या माझा कोणताही विचार नाही. पण काही असेल तर मी निश्चित सहभागी होईन. सध्या मी इतर प्रोजेक्ट, पॉडकास्ट व ‘डान्स दिवाने’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण मला जर कॉल आला तर मी नक्की जाईन”. अनेक कामांमध्ये व्यस्त असल्याने या पर्वामध्ये ती काम करु शकणार नाही. पण जर तिला बोलावले तर ती जाण्यासाठी तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
भारती याआधी कपिलच्या शोमध्ये काही पर्वात दिसून आली होती. भारतीने साकारलेली सर्व पात्र प्रेक्षकांनी पसंत केली आहेत. जरीही भारती या पर्वामध्ये कपिलबरोबर काम करत नसली तरीही त्या दोघांच्या मैत्रीच्या नात्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही.
कपिलचा नवीन शो ३० मार्चपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रिम होणार आहे. या पर्वातील पाहिल्या एपीसोडचे पाहुणे अभिनेते रणबीर कपूर व नितू कपूर असणार आहेत. तसेच यामध्ये पहिल्यांदाच आमिर खानदेखील असण्याची चर्चा सर्वत्र होत आहे.