इंडस्ट्रीतील झगमगत्या दुनियेत कित्येक कलाकार नवी स्वप्न घेऊन येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी अपयश येतं. अपयशामुळे अनेक कलाकार टोकाचं पाऊल उचलतात. बऱ्याचदा याला इंडस्ट्रीतील ग्रुपिझम, नेपोटीझमही जबाबदार असतं. यामधूनच बहुतांश वेळा काम न मिळाल्याची खंत कलाकार व्यक्त करतात. यामागचं मोठं उदाहरण म्हणजे सुशांत सिंह राजपूत. सुशांतची आत्महत्या नसून इंडस्ट्रीतीलच काही कारणास्तव त्याची हत्या झाली असल्याचे अजूनही आरोप केले जातात. आता या सगळ्या प्रकरणानंतर सुशांतचं नाव घेत बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाने धक्कादायक दावे केले आहेत. (amaal mallik talk about industry)
गायक अमाल मलिकने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतनंतर कार्तिक आर्यनच्या पाठी बॉलिवूड असल्याचं त्याचं म्हणणं आहे. अनेक निर्माते आणि सुप्रसिद्ध कलाकार कार्तिकला बॉलिवूड बाहेर काढण्यासाठी विविध प्लॅन करत आहेत असाही दावा अमालने केला आहे. त्याचं हे म्हणणं ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. बॉलिवूडचं काळं सत्य जगासमोर आणण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.
आणखी वाचा – “आमच्या घराण्यात तुमची भक्ती कोणीच केली नव्हती”, केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “श्वासाचा शेवट…”
मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत अमालने बॉलिवूडची काळी बाजू मांडली. तो म्हणाला, “बॉलिवूडचा खरा चेहरा आता सगळ्यांना माहित आहे. इथे काम करण्यातच लोकांचं आयुष्य निघून गेलं. सुशांत सिंह राजपूतबरोबर जे काही झालं ते तो सहनच करु शकला नाही. त्याच्याबरोबर जे काही झालं त्याला काहीजण हत्या म्हणतात तर काहीजण आत्महत्या. पण तो व्यक्ती तर निघून गेला ना. सामान्य माणसांचाही इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. माझ्याच काही मित्र मंडळींना ज्यांना बॉलिवूड माहीत नाही त्यांनीही इंडस्ट्री घाण आहे असं म्हणणायला सुरुवात केली आहे”.
आणखी वाचा – “प्रेम नको गिफ्ट द्या”, निना गुप्ता यांनी प्रेमाला मूर्खपणा म्हटलं आणि…; म्हणाल्या, “फक्त हे पुरेसे नाही”
पुढे अमाल म्हणाला, “सुशांत नंतरच इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला. सगळेच अपयशाच्या लायकीचे आहेत. चांगल्या व्यक्तीबरोबर खूप वाईट झालं. आता तुम्हीच बघा अप्रत्यक्षरित्या कार्तिक आर्यनबरोबरही हे लोक आता असंच वागत आहेत. तोही अशाच कठीण परिस्थितीमधून बाहेर आलेला आहे. पण त्याला त्याचे आई—डील योग्य ते मार्गदर्शन करतात, पाठिंबा देत आहेत. नवा कलाकार इंडस्ट्रीत आला आणि त्याने चांगलं काम केलं की, त्याला बाजूला काढण्यासाठी निर्माते, कलाकार प्लॅन करतात”. अमालने अगदी बिनधास्तपणे सत्य समोर आणलं.





