बॉलीवूड अभिनेता आमिर खान व किरण राव यांच्या नात्याबद्दल सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होत असलेली पाहायला मिळते. गेल्या वर्षी आमिर व किरण हे कायदेशीररित्या वेगळे झाले. पण त्यानंतरही त्यांना अनेक कार्यक्रमामध्ये एकत्रितपणे पाहायला मिळाले आहे. आमिरची मुलगी इरा खानच्या लग्नात दोघांना धमाल करताना पाहिले होते. त्यानंतर ‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या निमित्ताने व्यावसाईकरित्या एकत्र काम करताना दिसले. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी किरणने खासगी आयुष्यावर खुलेपणाने भाष्य केले होते. आता पुन्हा एकदा तिने आमिर व तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. (kiran rao and amir khan live in relationship)
किरणने ‘शी द पिपल’ या युट्यूब चॅनलबरोबर बोलताना लग्ननात्यावर भाष्य केले आहे. लग्न झाल्यानंतर महिलेच्याही जबाबदाऱ्या वाढतात त्यामुळे लग्न असो किंवा स्वतःसाठी महिला वेळ देऊ शकत नाही. तिला पती व कुटुंब या संगळ्यांशी चांगले संबंध ठेवण्याची जबाबदारी असल्याचे ती म्हणाली. मुलाखतीदरम्यान तिला विचारले की, “लग्न करण्यामागील विचार बदलणे गरजेचे आहे का?, त्यावर ती म्हणाली की, “मी व आमिर लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहत होतो. खरंतर आम्ही लग्नदेखील आई-वडिलांच्या दबावामुळे केले होते”.
पुढे ती म्हणाली की, “लग्न एक चांगली गोष्ट आहे. आपली वेगळी ओळख जपणे महत्त्वाचे आहे. लग्नामुळे तुम्हाला नवीन कुटुंब मिळते. नवीन नाती मिळतात. तसेच एक सुरक्षित भावना व स्थिरता आयुष्यात असते”. त्यानंतर किरणने नात्यामध्ये समानतेबद्दल बोलताना सांगितले की, “एका महिलेवर खूप जबाबदाऱ्या असतात. तिला घरही चालवायचे असते. कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवायचे असते. सासरच्याबरोबर नेहमी जमवून घेण्याची तिच्याकडून अपेक्षा केली जाते. त्यामुळे यासगळ्यावर चर्चा होणे महत्त्वाचे आहे”.
किरण व अमिरने २००५ साली लग्न केले. त्यानंतर एकमेकांबरोबर मतभेद झाल्यामुळे २०२१ साली घटस्फोट घेतला. पण घटस्फोट झाल्यानंतरही दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सांगतात. अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र एंजॉय करतानादेखील दिसतात.