Kajal Aggarwal accident rumor : दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालबाबत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. रोड अपघातात अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ही अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली. यानंतर, अभिनेत्रीला स्वत: पुढे यावे लागले आणि या अफवांचे खंडन करावे लागले. काजल अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवरील मृत्यूच्या अहवालांचे अफवा असल्याचे वर्णन केले. त्यांनी लिहिले, “मला काही अफवा बातमी मिळाली आहे, असा दावा केला की माझा अपघात झाला आहे आणि मी या जगात यापुढे नाही. आणि खरं सांगायचं तर ते खूप मजेदार आहे, कारण ते खोटे आहे”.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “देवाच्या कृपेने, तुम्हाला खात्री करुन घ्यायचे आहे की, मी अगदी ठीक आहे, सुरक्षित आहे आणि खूप चांगली आहे. अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा खोट्या बातम्या पसरवू नका अशी मी तुम्हाला विनंती करते”. ‘एनडीटीव्ही’ च्या वृत्तानुसार सोशल मीडियावर अनधिकृत अकाउंटवरून काजलचा अपघात झाल्यासंदर्भात पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये तिचा अपघात झाला असून तिला गंभीर दुखापत झाल्याचं म्हटले गेले, यामुळे तिच्या जवळच्या लोकांना व चाहत्यांना अभिनेत्रीबद्दल काळजी वाटत होती. काहींनी तिच्यासाठी प्रार्थना करत पोस्ट केल्या होत्या.
आणखी वाचा – “एकटेपण मला खात होतं”, ५१ व्या वर्षी एकटेपणाला वैतागली सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेकही बरोबर राहत नाही आणि…

काजलच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तिने २००४ मध्ये ‘क्यों! हो गया ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तमिळ आणि तेलगू सिनेमामध्येही तिचे मोठे नाव आहे. नुकतीच तिने ‘कन्नप्पा’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
काजल आता ‘द इंडियन स्टोरी’, ‘इंडियन 3’ आणि ‘रामायणम’ या चित्रपटात दिसणार आहे. यात रणबीर कपूर ते साई पल्लवी, सनी देओल, यश आणि रवी दुबे यासारखे अनेक कलाकार आहेत. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, काजलने २०२० मध्ये व्यावसायिक गौतम किचलूशी लग्न केले. त्यांना नील नावाचा मुलगा आहे.





