Shilpa Shirodkar loneliness : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने हिंदी सिनेविश्वात बरंच काम केलं. हिंदी ‘बिग बॉस’ मुळेही त्या मध्यंतरीच्या काळात चर्चेत आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांनी रमेश सिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात मिथून चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर मिथून चक्रवर्ती आणि शिल्पा शिरोडकर यांनी ‘खुदा गवाह’, ‘हम’, ‘आँखे’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने प्रसिद्धीझोतापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिने अपरेश रणजीत यांच्याशी लग्न केले आणि त्या परदेशात स्थायिक झाल्या. परदेशात राहण्याच्या अनुभवाबाबत अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
शिल्पा शिरोडकरने नुकतीच ‘डेलनाज इराणी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान परदेशात राहण्याचा अनुभव सांगताना शिल्पा म्हणाली की, “मला लोकांमध्ये राहायला आवडतं आणि जे करिअर मी निवडलेलं त्यामुळे मी नवनवीन लोकांना भेटायचे. मी खूप व्यग्र असायचे. त्यामुळे परदेशात राहताना मला खूप एकटेपणा जाणवायचा. आम्ही कधीच एका देशात नाही राहिलो. आम्ही खूप प्रवास केला त्यामुळे माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. एकटेपण मला खात होतं”.
आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, प्रेग्नन्सी किट दाखवत दिली गुडन्यूज
पुढे ती म्हणाली, “माझा नवरा त्याच्या कामामुळे खूप प्रवास करतो. माझी मुलगी शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. त्यामुळे मी घरी एकटीच असते. मी तरुण असताना याबद्दल काही वाटायचं नाही. पण आता मला आजूबाजूला माणसं हवी असतात. मला माणसांनी भरलेलं ते वातावरण खूप आवडतं”. पुन्हा काम करण्याबद्दल शिल्पा म्हणाली की, “मी काम मिळवण्यासाठी कास्टिंग एजेंटला फोन करायचे आणि ते प्रतिसादही द्यायचे”.
कामाबाबत अभिनेत्री म्हणाली, “कास्टिंग एजेंटला माहित आहे की मी काम शोधतेय”. यादरम्यानचा अनुभव सांगताना शिल्पा म्हणाली की, ‘एका गाजलेल्या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनसाठी तिला विचारण्यात आलं होतं. पण, त्यातील काही सीन्समुळे तिने नकार दिला. जेव्हा अभिनेत्रीनं नकार दिला, तेव्हा एजंटने आणखी एक भूमिका असल्याचं सांगितलं. पण नंतर पुढे काही झालं नाही”.





