बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअर्सच्या चर्चा बऱ्याचदा होताना दिसतात. त्यातील विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रॉय यांचं अफेअर असं आहे जे बॉलिवूडमध्ये बरंच गाजलं होतं. बऱ्याचदा यावर अनेक खुलासे होताना दिसतात. या नात्याबद्दल विवेक बऱ्याच वेळा मुलाखतीत बोलताना दिसतो. आताही त्याने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केलं. त्यावेळी त्याने त्याच्या अफेअर्सबद्दल खुलासे केले. (Vivek oberoi reveals exgirlfriends came to his wedding)
विवेक व ऐश्वर्याची लवस्टोरी ही इंडस्ट्रीतील खूप मोठा चर्चेचा विषय होता. ऐश्वर्याचा सलमान खानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर विवेक व ऐश्वर्याने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. २००५ मध्ये दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. त्यामागचं कारण सांगताना विवेक दावा करतो की, त्याच्याबरोबर ऐश्वर्याने न राहण्याची सलमान खानने धमकी दिली होती. या सगळ्याचा परिणाम त्याच्या करिअरवरही झाल्या असल्याचेही तो बोलला होता. आता बऱ्याच वर्षानंतर विवेकने त्यांच्या नात्याबद्दल आणि भूतकाळाबद्दल खुलासा केला आहे.
अलीकडेच विवेकने ‘अनस बौखश’च्या पॉडकास्टशी संवाद साधला. त्यावेळी त्याने त्याच्या भूतकाळातील गोष्टींबाबत वक्तव्य केले. याबाबत बोलताना त्याने सांगितलं की, कशाप्रकारे त्याला भूतकाळातील नात्यांमध्ये धोका मिळाला आहे. यावेळी कोणाचंही नाव न घेता त्याने ऐश्वर्या राय बच्चनबरोबरच्या ब्रेकअपबद्दल वक्तव्य केलं. ऐश्वर्यानंतर विवेक मॉडेल गुरप्रीत गिलला डेट करत होता. पण तिच्याकडूनही तिला धोका मिळाला. त्यानंतर त्यांची भेट प्रियांका अल्वासह झाली. तिच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्याच्या आयुष्याला नवीन वळण आलं. त्यानंतर त्याने त्याचं आयुष्य खाजगी ठेवलं.
याबद्दल वक्तव्य करताना तो बऱ्याचदा कॅज्युअल डेटिंगपासून ते सीरियस रिलेशनशीपपर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना तो सांगतो, “रिलेशनशीपमधून फसवणूक मिळाल्यानंतर माझा प्रेमावरून विश्वास उडाला. मी त्यानंतर २९ ऑक्टोबर २०१० ला प्रियांका अल्वाबरोबर लग्न केलं आणि तिच्यातच प्रेम शोधलं. असा माझ्या बऱ्याच एक्स गर्लफ्रेंड होत्या. ज्यांच्याबरोबर माझं चांगलं नातं होतं आणि त्या सगळ्या जणं माझ्या लग्नात उपस्थित होत्या”. विवेक ओबेरॉयने २९ ऑक्टोबर २०१०ला प्रियांका अल्वाबरोबर लग्न केलं. त्यांना २ छान मुलं ही आहेत. त्याच्या मुलाचं नाव विवान तर त्याच्या मुलीच नाव अमेया असं आहे.