John Abraham films : ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घातला. अनेक वाद होऊनही हा चित्रपट सिनेरसिकांच्या मनात घर करताना दिसला. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळाल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन प्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण सुप्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम याने चित्रपटाबाबत केलेलं वक्तव्य धक्कादायक होतं. अभिनेत्याने ‘छावा’, ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासारखे चित्रपटांची निर्मिती करणार का असा सवाल केला असता अभिनेत्याने या प्रश्नाचे उत्तर देत असं म्हटलं की, “मी छावा सिनेमा पाहिलेला नाही”.
जॉन अब्राहमने नुकतीच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने सेन्सॉरशिपबद्दलही सांगितलं आहे. याबद्दल तो म्हणाला, “आपल्याला सेन्सॉरशिपची गरज आहे पण ती ज्या पद्धतीने हाताळली जात आहे. त्यावर थोडे प्रश्नचिन्ह आहेत. ते आमच्याशी चांगले वागले आहेत, पण मीसुद्धा माझे चित्रपट जबाबदारीने बनवलेत. मी डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा माणूस नाही. मी राजकारणापासून दूर आहे. अशा चित्रपटांना नफा आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षकपसंती मिळत असतानाही त्याला असे चित्रपट बनवायची इच्छा नसल्याचं त्याने म्हटलं आहे”. अभिनेता म्हणाला, “उजव्या विचारसरणीच्या चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकपसंती मिळत असून मला ही चिंताजनक बाब वाटत आहे”.
अभिनेता पुढे म्हणाला, “कारण जेव्हा तुम्ही चित्रपट निर्माता म्हणून स्वतःला प्रश्न विचारता की तुम्ही कोणत्या प्रकारच्या चित्रपटांना पसंती देता, तेव्हा मी व्यावसायिक चित्रपट करणार का की माझं जे म्हणणं आहे ते चित्रपटांतून मांडणार? याची आधी निवड करेल”. ‘छावा’ किंवा ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट बनवण्याची कधी इच्छा झाली का असं विचारण्यात येताच तो म्हणाला, “मी ‘छावा’ पाहिलेला नाही, पण मला माहीत आहे की लोकांना तो आवडला आहे आणि मी ‘द काश्मीर फाईल्स’ही पाहिलेला नाही”.
पुढे तो म्हणाला, “जेव्हा चित्रपट अतिराजकीय वातावरणात लोकांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने बनवले जातात आणि अशा चित्रपटांना प्रेक्षकही मिळतात, तेव्हा ती गोष्ट मला भयावह वाटते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले, तर नाही. मला कधीच अशा प्रकारचे चित्रपट बनवण्याचा मोह झाला नाही आणि मी कधीच असे चित्रपट बनवणारही नाही”.





