Bihari youth viral video : संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा देखील. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर म्हणाले, ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।। असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली. पण आज हीच मराठीची महती कुठेतरी पुसत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करताच हे प्रकरण चांगलंच पेटून उठलं. दरम्यान, मनसे पक्षाने आणि इतर पक्षाने यांत डोकावताच या प्रकरणाला वादाचं रूप मिळालं. सोशल मीडियावर तर हिंदी भाषिक लोकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच, सोशल मीडियावर हिंदी भाषिक इसमाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. महाराष्ट्रात राहून मराठी ही यायलाच हवी, नसेल येत तर माज दाखवू नये असं म्हणत या परप्रांतीयाने अनेकांची मनं जिंकली.
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये तो तरुण सांगत आहे की, “महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. जन्मभूमी बिहार, जिल्हा भोजपूर आहे. मी सत्याच्या बाजूने आहे. महाराष्ट्रात कमावत आहे, खात आहे, राहात आहे तर मग मराठी बोलायला हरकत काय आहे? चार लोकांचा सन्मान करायाला हरकत काय आहे? चार लोकांचा मान ठेवून मला चार गोष्टी मिळत असतील त मी त्याच गोष्टींकडे लक्ष देईल. मराठी माणूस तुमच्याकडे येत असेल आणि मराठी बोलण्याचा आग्रह करत असेल तर एवढंच बोलायचं आहे की, हा दादा, जय शिवराय. मग बघा मराठी माणूस तुमच्याबरोबर किती चांगलं वागेन”.
पुढे तो म्हणाला, “उत्तर भारतीय नंतर आधी मी भारतीय आहे आणि भारताचा इतिहास मराठ्यांशिवाय अपूर्ण आहे मग त्यांच्या बाजूने का उभे राहू नये. मला कधी मराठीमुळे कोणताही धोका वाटला नाही. मुद्दाम खोटी माहिती पसरवली जाते की, मराठी लोक यूपी, बिहारी लोकांना मारतात, त्यांच्या धर्माच्या वाटेला गेला तर ते कोणाचेच नाही. मराठी त्यांची आई आहे, आईला त्रास दिला तर ते बरोबर अद्दल घडवतात. त्यांना सांगा की, मी मराठी शिकत आहे. मराठीचा सन्मान करत आहे. विरोध नाही करत, विरोध करू नका, विरोध केला तर मनसेचे लोक तुम्हाला विरोध करतील. मराठीला विरोध केला तर मीरा रोडमध्ये राहणे देखील अवघड होईल. मी देखील मीरा रोडमध्ये राहतो, मी देखील हिंदी बोलतो. मी बिहारचा मुलगा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करतो. मराठी भाषा त्यांची आहे”.
आणखी वाचा – “मी वडिलांची भूमिका नाही बजावत”, सावत्र मुलासह असं आहे अनुपम खेर यांचं नातं, स्वतःच केला खुलासा, म्हणाले…
जेव्हा मुलाखत घेणारा व्यक्ती त्या बिहारी तरुणाला विचारतो की, “तुम्हाला वाईट अनुभव आला आहे का?”. त्यावर तो उत्तर देतो की, “तुमच्यासमोर उभं राहून एक बिहारी मुलगा बोलत आहे हे मुंबईचे मोठ मनं आहे. हे मराठी माणसांच्या मनाचा मोठेपणा आहे”. अर्थातच या परप्रांतीय तरुणाचा व्हिडीओ मनं हेलावणारा आहे.





