टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम सध्या खूप चर्चेत आला आहे. त्यामध्ये विविध क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. हा शो सुरु झाल्यापासूनच वाद-विवाद पाहयाल मिळाले आहेत. पहिल्या दिवशी वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळी यांच्यामध्ये भांडणं झाली होती. त्यांची भांडणं सोशल मीडियावर अधिक चर्चेत आली होती. मात्र काही कालावधीनंतर त्यांच्यामधील भंडाणं मिटली आहेत. याबरोबरच सूरज चव्हाणदेखील अधिक चर्चेत राहिला. सुरुवातीला सूरजला अधिक पसंत केले जात नव्हते मात्र त्याचा खेळ बघून त्याला चाहत्यांची अधिक पसंती मिळाली आहे. (Bigg boss marathi update)
सूरज या शोमध्ये आल्यानंतर तो नेहमीच चांगला खेळ खेळताना दिसला. यामध्ये अनेकदा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावदेखील झाला. त्याची भाषाशैली व बिनधास्त अंदाज नेहमी पाहायला मिळतो. त्याने केलेळे रॅपदेखील प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरताना दिसतात. रितेश देशमुखदेखील त्याला खूप पसंती देताना दिसतो. त्याच्या बिनधास्त अंदाजाबरोबरच अनेकदा हळवी बाजूदेखील पहायला मिळाली आहे. नुकताच सूरजचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो त्याच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे.
‘बिग बॉस’चा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सूरज गावाबद्दल बोलताना दिसत आहे. घरामध्ये सूरज, पंढरीनाथ कांबळे व अंकिता वालावलकर गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी सूरज पॅडीचे पाय दाबताना दिसत आहे. तेव्हा सूरज म्हणतो की, “मला गांव महत्त्वाचं आहे. मी गांव कधी बघतोय असं झालं आहे”. त्यावर अंकिता म्हणते की, “हेच तर आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागत आहे”. त्यानंतर सूरज म्हणतो की, “मी एकदम साधा मुलगा आहे.
पुढे तो म्हणतो की, “पण मला राग आला की मागे पुढे बघत नाही. पण मी इथे स्वतःवर नियंत्रण ठेऊन आहे”. दरम्यान या व्हिडीओमध्ये सूरजला त्याच्या गावाची तसेच घराची आठवण येत असलेली दिसून येत आहे. सध्या सूरजचा खेळ चांगलाच रंगात आलेला दिसून येत असून आता पुढे अंतिम सामन्यापर्यंत नक्की होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.