Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे नुकताच या घरात ‘फॅमिली स्पेशल’ एपिसोड पार पडला. नुकत्याच झालेल्या गुरुवारच्या भागात घरात वर्षा, अभिजीत व डीपी यांच्या घरातील कुटुंबीयांनी हजेरी लावली. आजच्या भागात उर्वरीत सदस्यांच्या कुटुंबियांची घरात एंट्री होणार आहे, यावेळी निक्कीची आईदेखील घरात येणार आहे आणि याचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्कीची आई तिला घरात भेटायला आली असून यावेळी ती अरबाजचा साखरपुडा झाला असल्याचे निक्कीला सांगते.(Arbaz Reacted on His Engagement Rumour)
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्कीच्या आईने तिला अरबाजबद्दल काही गोष्टी सांगताच निक्कीने अरबाजबरोबरचं तिचं नातं संपवलं असल्याचे म्हटलं आहे. या प्रोमोमध्ये निक्कीची आई निक्कीला असं म्हणते की, “अरबाज चुकीचा चालला आहे. त्याने असं नाही करायला पाहिजे. त्याचा साखरपुडा झालेला आहे असं म्हणतात”. त्यानंतर निक्की असं म्हणते की, “हे अरबाज-निक्की जे होतं ना ते आता संपलं आहे”. या प्रोमोनंतर सर्वत्र अरबाजच्या साखरपुड्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे या सर्व चर्चांवर आता स्वत: अरबाजने भाष्य केलं आहे.
इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याने ब्रॉडकास्ट चॅनेल सुरु करत त्याद्वारेच प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मी आत्ताच कलर्स मराठीवरील प्रोमो बघितला आणि त्यात निक्कीची आई म्हणते की अरबाजचा साखरपुडा झाला आहे. पण मी हे सांगू इच्छितो की माझा साखरपुडा झालेला नाही किंवा लग्नही झालेलं नाही. या सगळ्या अफवा आहेत. यावर विश्वास ठेवू नका, माझ्याबद्दलच्या या सगळ्या अफवा आहेत. निक्की हे ऐकून प्रतिक्रिया व्यक्त करणारच कारण तिला बाहेरची परिस्थिती माहित नाही. खरं काय खोटं काय याबद्दल तिला कल्पना नाही. पण टेन्शन घेण्यासारखे काही नाही.
यापुढे त्याने “आम्ही भेटलो की, मी निक्कीला याबद्दल समजावेनच. तिने समजून घेतलं तर ठीक आहे नाही तर माझी काही हरकत नाही. पण माझ्या साखरपुड्याबद्दलच्या बातम्या सगळ्या अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका”. असं म्हटलं आहे.दरम्यान, या घरात निक्की व अरबाज यांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती, भाऊच्या धक्क्यावर अरबाजने तो कमिटेड असल्याचे कबूल केल्यानंतरही त्याची निक्कीबरोबर जवळीक होती. या घरात दोघांमध्ये अनेकदा वादही झाले. पण तरीही त्यांचे खास नातेही प्रेक्षकांना पाहायला मिळाले.