सध्या मालिका विश्वात एकाच मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे ती मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका. गेली साडेचार वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेत याआधी अनेकदा अनेक वेगवेगळे ट्विस्ट्स आले आहेत. यावेळी प्रेक्षकांनी प्रत्येक ट्विस्टवर त्यांची सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला आहे, ज्यावर प्रेक्षक नाराज आहेत.
मालिकेत नुकतेच आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मात्र, मालिकेत आलेले हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना आवडलेले नाही. ‘आई कुठे काय करते’च्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यावर मालिकेतील कलाकारदेखील त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
यावेळी मालिकेत अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने उत्तर देत असं म्हटलं की, “या प्रोमोवरील सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया वाचल्या. आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा आईला आपल्या मुलांची गरज असते आणि मालिकेत तो हा क्षण आहे. मालिकेत आलेले हे नवीन वळण खूपच भयंकर आहे. पण काही जण या ट्विस्टमध्ये स्वत:ला अनुभवत आहेत.”
आणखी वाचा – “सोमीला वाचवा”, पूर्वाश्रमीच्या पतीबाबत राखी सावंतचं वक्तव्य, आदिल खान भडकला, म्हणाला, “जगाने तिच्यापासून…”
यापुढे तिने असं म्हटलं की, “मालिकेत अरुंधतीबाबत दाखवण्यात आलेला हा क्षण माझ्या आयुष्यातही येऊन गेला आहे. कारण माझे वडील गेल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या आईलाही आता आमची गरज आहे. तर हेच अरुंधतीच्या आयुष्यातही घडत आहे. त्यामुळे हे खूपच भयंकर आहे.”
आणखी वाचा – मोठी बातमी! अमिताभ बच्चन मुंबईतील रुग्णालयामध्ये भरती, बिग बींची अँजिओप्लास्टीही झाली, आता प्रकृती कशी?
दरम्यान, यापुढे मालिकेतील अभिषेक म्हणजेच अभिनेता निरंजन देशमुखनेही मालिकेतील हे नवीन वळण अगदीच अनपेक्षित असल्याचे म्हटले. तसेच यापुढे मालिकेतील आईचा प्रवास कसा असणार आहे? त्यामुळे प्रेक्षकांसह आम्हीदेखील मालिकेतील नवीन ट्विस्टसाठी उत्सुक आहोत.”