छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत आलेल्या लीपमुळे ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. काही वर्षांचा लीप घेत ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांसमोर आली आहे आणि त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत अप्पी व अर्जुन यांची ताटातूट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र आता सात वर्षांनंतर अप्पी व अर्जुन पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत.
७ मे रोजी या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अप्पी व अर्जुन यांची भेट होतानाचे पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पहायला मिळत आहे की, अमोल व अप्पी फिरायला जातात तेव्हा अमोलची टोपी खाल पडते. ती आणायला अप्पी खाली येते. टोपी उचलल्यानंतर अप्पीचा तोल जातो आणि ती खाली पडणार तेव्हा अर्जुन तिला पकडतो आणि तिला आधार देतो.
अशातच मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अमोल आपला मुलगा असल्याचं सत्य अर्जुनसमोर येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. यात अप्पी तिच्या बाबांना असं म्हणते की, “बापू मला अर्जुन भेटला होता. अमोलला मी सांभाळलं आहे. त्यामुळे आत्ता त्याच्यावर तुझा काहीही हक्क नाही असं म्हणत मी त्याला स्पष्ट नकार दिला.
तर या व्हिडीओत अर्जुनलाही अमोल त्याचाच मुलगा असल्याबद्दल खात्री वाटत आहे. “सिंबा माझा तर मुलगा नाही ना?” असा विचार करत त्याला अमोलबरोबरचे काही खास क्षण आठवत आहेत. त्यामुळे अर्जुनची खात्री व्हावी म्हणून तो अमोलला अप्पीबरोबर बघण्याचा विचार करतो. उद्या सिंबाला सोडायला अप्पी येते का बघू? असा विचार करत आहे.
आणखी वाचा – अप्पी-अर्जुन एकत्र येण्यासाठी अमोलचं छत्रपती शिवाजी महाराजांना गाऱ्हाणं, हातही जोडले, एकत्र येणार का?
त्यामुळे आता सिंबा म्हणजेच अमोलचं सत्य अर्जुनसमोर येणार का? अप्पी अमोल व अर्जुनची भेट घडवून आणणार का? अप्पी-अर्जुन पुन्हा एकत्र येणार का? त्यांच्यात अमोलमुळे पुन्हा पूर्वीसारखे नाते निर्माण होणार का? हे पाहण्यासाठी मालिकेचे प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. मालिकेत पुढे काय होणारहे पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता लागून राहिली आहे.