Anushka Sharma Virat Kohli Troll : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मंगळवारी १६ डिसेंबर रोजी पती विराट कोहलीसोबत वृंदावनला पोहोचली, जिथे तिने कुंज आश्रमात संत प्रेमानंद जी महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ही तिसरी वेळ होती जेव्हा अनुष्का आणि विराट प्रेमानंद जी महाराजांना भेटायला आले होते. पण आता तो एका कारणाने लोकांच्या निशाण्यावर आला आहे आणि नेटकरी त्याला खडेबोल सुनावत आहेत. खरं तर, प्रेमानंद जी महाराजांना भेटल्यानंतर अनुष्का आणि विराट दोघेही मुंबईत पोहोचले, त्याआधी विमानतळावरील एका अपंग चाहत्याने कोहलीला त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती करण्यास सुरुवात केली, परंतु त्याने आणि अनुष्काने चाहत्याकडे दुर्लक्ष केले.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने त्या दिव्यांग चाहत्याकडे ढुंकूनही पाहिले नाही आणि ते त्यांच्या गाडीकडे गेले आणि तो चाहता फक्त त्यांच्याकडे बघतच राहिला. अनुष्का आणि विराटची ही वृत्ती नेटकऱ्यांना काही आवडली नाही आणि त्यांनी या जोडप्यावर टीका केली. ते म्हणतात प्रेमानंदजी महाराजांकडे जाण्याचा काय उपयोग जेव्हा हेच करावे लागते. अनुष्का आणि विराट प्रेमानंद जी महाराजांना भेटल्याच्या व्हिडीओ व्यतिरिक्त, चाहत्यांसह या वाईट कृतीचा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे आणि नेटकरी यावर जोरदार कमेंट करत आहेत.
आणखी वाचा – “आमची जमीन विकून देणगीदारांचे पैसे…”, ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा कठीण काळ; म्हणाल्या, “देवाने मला…”

एकाने लिहिले आहे की, “आध्यात्मिक सहलीला जा पण अपंग चाहत्यांशी उद्धटपणे वागा”. दुसऱ्या वापरकर्त्याची टिप्पणी आहे, “अत्यंत घृणास्पद वर्तन. अध्यात्म आणि नम्रतेचीही तीच अवस्था आहे”. आणखी एक कमेंट आली आहे, “प्रेमानंदजींना भेटून काय उपयोग, तिथून परतल्यावरही कोणी एवढ्या उद्धटपणाने, अभिमानाने फिरत असेल तर? फक्त फोटो काढण्याची इच्छा असलेल्या अपंग मुलाकडे दुर्लक्ष करणे हृदयद्रावक आहे. मला त्याचे खूप वाईट वाटते. विराट चांगला वागला नाही, तो खूप वाईट वागला”, अशी एका यूजरची कमेंट आहे.
आणखी वाचा – सुरजपाठोपाठ आणखी एका अभिनेत्याची लगीनघाई, कुटुंबियांकडून थाटामाटात केळवण, होणारी बायको आहे…
एकाने लिहिले, “त्या मुलाकडे दुर्लक्ष का केले? आपण किमान हाय-हॅलो म्हणू शकला असता? तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून फक्त काही सेकंद काढा. वाईट वाटतं त्या मुलाचं. त्यांनी मुलाचा आणि त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे”. अनुष्का आणि विराट नुकतेच लंडनहून भारतात आले होते. येथे आल्यानंतर ते प्रेमानंद जी महाराजांच्या आश्रमात त्यांना भेटण्यासाठी पोहोचले. तिथे दोघेही प्रेमानंदजींसमोर गुडघ्यावर बसून त्यांचे बोलणे ऐकत राहिले. मग त्यांचे आशीर्वाद आणि परम ज्ञान घेतले. यावेळी विराट आणि अनुष्काने गळ्यात तुळशीची माळ कंठी परिधान केली होती. या दोघांनीही प्रेमानंद जी महाराजांकडून दीक्षा घेतली.





