आपला अभिनय व नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एक नाव हमखास घेतलं जातं, ती म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. अमृताने छोट्या पडद्यातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केला आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अमृताला अभिनेत्री म्हणून ओळखलं जात असलं. त्याचबरोबर ती उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळखली जाते. ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील ‘चंद्रा’ गाण्याने अमृताची जगभरात ओळख मिळाली आहे. (Amruta Khanvilkar big Statement)
लावणी नृत्यांगना म्हणून ओळखली जाणारी अमृता कथक नृत्याची प्रचंड चाहती असून काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गणराया गजानन’ गाण्यामुळे ती चर्चेत आली आहे. नुकतंच हे गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याच्या प्रमोशन निमित्ताने अमृता सध्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबर विविध माध्यमांना मुलाखत देते. नुकतंच अमृताने एक मुलाखत दिली असून ज्यात तिने केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली.
‘मिर्ची मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं. शिवाय प्रमोशन करण्यासाठी विविध कार्यक्रमामध्ये जात असताना कलाकारांची केली जाणारी थट्टा तिला आवडत नसल्याचं अमृताने सांगितलं. याबाबत अमृता म्हणाली, “माणूस आहे त्याला त्याचा आदर द्या. असं म्हणत नाही की, खूप मोठं काम मी माझ्या आयुष्यामध्ये केलं आहे. पण माणूस म्हणून एकमेकांचा आदर केला पाहिजे”.
हे देखील वाचा – ५६व्या वर्षीही एकदम फिट आहे अक्षय कुमार, पाण्यात वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “मला हा व्यायाम…”
“आम्ही प्रमोशनसाठी वगैरे बऱ्याचदा जातो. काही शोमध्ये सतत कलाकारांची खेचली जाते. ते मला आवडत नाही. असं करु नका मला अजिबात हा प्रकार आवडत नाही. आपल्या मराठीमध्ये हा प्रकार खूप घडतो. मजेसाठी कलाकारांची इतकी खेचली जाते की, डोक्यात जायला लागतं. मला हा प्रकार आवडत नाही कारण मी स्वतः कोणाशी असं कधीच वागत नाही. मी कोणाला काही वेगळ्याप्रकारे बोलतही नाही. समोरच्या माणसाला वाईट वाटेल असं बोलणं मी टाळते”. अमृताने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या.