Rituraj Singh Death : हिंदी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दुख:द बातमी समोर येत आहे. टीव्ही मालिकांचा व चित्रपटांचा प्रसिद्ध चेहरा असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन झाले आहे. काल (१९ जानेवारी) रोजी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. ऋतुराज यांना स्वादुपिंडाच्या काही आजाराने ग्रासले होते. अशातच काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.
वृत्तानुसार, ऋतुराज यांना स्वादुपिंडाच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात सुधारणा होऊन ते घरी परतल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
अमित बहल या ऋतुराज सिंह यांच्या जवळच्या मित्राने त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. यावेळी अमित बहल यांनी असं म्हटलं की, “होय. ऋतुराज यांचे “हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. त्यांना स्वादुपिंडाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र घरी परतल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले”.
आणखी वाचा – “अफेअर केलं तरी…”, अफेअरवरुन प्रश्न विचारताच प्रशांत दामलेंनी दिले स्पष्ट उत्तर, म्हणाले, “एका लग्नानंतर…”
दरम्यान, ऋतुराज यांनी अपनी बात , हिटलर दीदी, ज्योती, शपथ, वॉरियर हाय, आहट, अदालत, दिया और बाती हम, अनुमपा अशा मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. त्याचबरोबर काही हिंदी चित्रपट व वेबसीरिजमध्येही अभिनय करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
आणखी वाचा – लातूरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, लोक भडकले, म्हणाली, “शिवाजी…”
ऋतुराज सिंग यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन सृष्टीत सध्या शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनावर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार व चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.