महाभारत या मालिकेने एक काळ गाजवला होता. मालिकेतील प्रत्येक कलाकार घरोघरी पोहोचला.शकुनी मामांशिवाय महाभारत अपूर्ण आहे. शकुनी मामा या भूमिकेतून घराघरात पोहचलेले अभिनेते म्हणजे गुफी पेंटल. गुफी पेंटल यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी खालावली होती.या बाबतची माहिती अभिनेत्री टीना घइने दिली होती.(Gufi Paintal Death)
गेल्या काही दिवसांपासून गुफी पेंटल यांच्यावर अंधेरीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सुरवातीला त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा, ते फरिदाबाद होते, तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्या नंतर त्यांना उपचारासाठी मुंबई मध्ये दाखल केले. आणि आज ५ जून रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
महाभारतासोबतच अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये गुफी पेंटल यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.यात रफू चक्कर हा चित्रपट तर अकबर बिरबल,सीआयडी, राधा कृष्णा या मालिकांचा समावेश आहे.अभिनयसोबतच कास्टिंग दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे.जय कन्हेया लाल की, ही गुफी पेंटल यांची शेवटची मालिका होती.(Gufi Paintal Death)
हे देखील वाचा : ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे’.या वक्तव्यामुळे अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत
गुफी पेंटल यांना शकुनी मामा ही भुमीका कशी मिळाली हे देखील विशेष आहे. महाभारत या कार्यक्रमाचे कास्टिंग डिरेक्टर हे गुफी पेंटल स्वतःच होते. शकुनी मामा या भूमिकेसाठी ते योग्य चेहरा शोधत होते, काही नाव त्यांनी फायनल केली होती,पंरतु मालिकेच्या लेखकांनी शकुनी मामाच्या भूमिकेसाठी गुफी पेंटल यांची निवड केली. आणि गुफी पेंटल यांची ही भूमिका अजरामर झाली.