पावनखिंड चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. म्हणूनच चित्रपट प्रचंड गाजला.चित्रपट जितका प्रेक्षकांपर्यंत पोहचतो तितके ते कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करतात. या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. काही महिन्यांपूर्वी अजय यांनी विशाल गडच्या पायथ्याशी असणाऱ्या आंबा गावात त्यांचं नवीन घर बांधलं. या घराची विशेष चर्चा होती.(ajay purkar)
आई बाबांचं घर असं त्यांच्या घराचं नाव आहे.प्रत्येक घराची, वस्तूची एक गोष्ट असते. अशीच अजय यांच्या घराची नेमकी काय गोष्ट आहे या बद्दल त्यांनी, इट्स मज्जाच्या माझ्या घराची गोष्ट या विशेष कार्यक्रमात सांगितलं आहे.हे घर नेमकं त्यांनी कसं बांधलं त्या मागची नेमकी काय गोष्ट आहे ते जाणून घेऊया.
पाहा काय आहे अजय पुरकर यांच्या घराची गोष्ट? (ajay purkar)
ते म्हणाले,ते ज्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकले ते पंडित विजय सरदेशमुख यांचे वर्गमित्र संजीव ताटके. अनेक मैफिलींमध्ये अजय त्यांच्या गुरूंना तानपुऱ्यावरती साथ द्यायचे. त्या निमित्ताने अनेक लोकांसोबत ओळखी व्हायच्या.तेव्हा संजीव ताटकेंसोबत अजय यांची ओळख झाली.तेव्हा ते अजय यांना म्हणाले होते, की आंबा घाटात माझी छान प्रॉपर्टी आहे, ती तुला दाखवायची आहे.
तेव्हा १५ वर्षांपूर्वी अजय त्या जागेवर राहून गेले होते, पंरतु तेव्हा त्यांच्या डोक्यात ती जागा घेण्याचं किंवा तिथे घर वैगरे बांधण्याचा असं काही विचार नव्हता.पंरतु असं म्हणतात का की काही गोष्टींचा योग्य यावा लागतो आणि त्यावेळेला ती गोष्ट होतेच, असचं काहीस अजय यांच्या सोबत घडलं,तो योग होता पावनखिंड चित्रपटाचा.चित्रपट प्रदर्शित झाला.आणि संजीव ताटके यांची फार इच्छा होती की अजय यांनी ती जागा पाहावी आणि तिथे घर बांधव त्यांचं हे म्हणणं अखेरीस अजय यांनी मनावर घेतलं.आणि तो एक योग होता की पावनखिंडच यश आणि त्या जागेवर त्यांनी त्यांच घर बांधलं.
हे देखील वाचा : “संजयच्या त्या कमेंटमुळे मी ऑस्कर जिंकले”