‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेच्या रंजक कथानकाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत आशुतोष केळकरच्या मृत्यूने अरुंधतीच आयुष्य बदललेलं पाहायला मिळत आहे. तर सुलेखा ताईंनीं पाठ फिरवल्याने अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला येते. मात्र देशमुखांच्या घरी अरुंधतीच राहणं संजनाला पटत नाही. संजनाच्या सततच्या या त्रासाला कंटाळत अरुंधती दुसरं घर घेते आणि तिकडे राहायला जाते. (Aai Kuthe Kay Karte Promo)
तर इकडे संजनानंतर अरुंधतीचा राग राग तिची लेक इशाही करते. इशाही आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरते. आणि तिचा राग राग करते. तर घरात यश व आरोहीच लग्न झालेलं असतं. देशमुखांच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळाली. यश व आरोहीच्या लग्नाला इशा देशमुखांच्या घरी आलेली असते. त्यादरम्यान इशाची अंगठी हरवते. इशा अंगठी चोरल्याचा आरोप नव्या नवरीवर म्हणजेच आरोहीवर लावते.
मात्र आरोहीने ती अंगठी चोरलेली नसते हे सिद्ध व्हायचं बाकी असतं म्हणून अरुंधती व अनिशच्या सांगण्यावरूनही इशा आरोहीची माफी मागत नाही. इशा माफी मागत नाही हे लक्षात येताच अनिश तिला सांगतो ज्या दिवशी हे सिद्ध होईल तेव्हा तू नाक घासून आरोहीची माफी मागायची. यानंतर अंगठी सापडते आणि अरुंधती आरोहीची माफी मागायला लावते. तर अनिश इशाला थांबवतो आणि आरोहीची नाक घासून माफी मागायला लावतो.
यानंतर आता मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सुलेखा ताई इशाला देशमुखांच्या घरी घेऊन येतात आणि सांगतात, “तुमच्या मुलीने हद्द पार केली. आशुतोषच्या मृत्यूचं भांडवल केलं” . यावर नितीन सांगतो, “इशाने त्यांचं घर हे हॉंटेड असल्याची बातमी सर्वत्र पसरवली आहे”. त्यांनतर अनिश बोलतो, “अरुंधती मॅम मी इशाला घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला आहे”. यावर अरुंधतीच्याही डोळ्यात पाणी येत, अरुंधती इशाला बोलते, “तू माझी मुलगी असल्याची मला लाज वाटत आहे”.