‘मीडिया वन सोल्युशन्स’ व ‘इट्स मज्जा’ हे कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि या हमीपूर्ततेसाठी ‘इट्स मज्जा’ कायमच मनोरंजक कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी ‘इट्स मज्जा’ ‘पाऊस’ या नवीन सीरिजमधून एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आली आणि या सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वेबसीरिजमधून प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणाऱ्या सायली आणि विशालची लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. मात्र आता ही सीरिज अंतिम टप्प्यावर आली आहे. (Itsmajja Paus Series)
Wrong Number ने सुरु झालेली सायली-विशाल यांची Right Lovestory प्रेक्षकांना खूपच भावली. या दोघांमधील प्रेमाचे काही खास क्षण प्रेक्षकांनी चांगलेच एन्जॉय केले. पण आता सायली-विशाल यांची ही प्रेमकहाणी एका निर्णायक वळणावर आली आहे. नुकतंच सायलीचे रोहितबरोबर लग्न झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आणि सायली गरोदर असल्याचेही पाहायला मिळाले. विशालच्या आठवणीत सायलीने त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण तो तिथे नसल्याने तिने त्याला एक पत्र लिहिले, ज्यात तिने तिचं लग्न झाल्याचे सांगितले. तसंच तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही असंही म्हटलं.
गेल्या अनेक दिवसांपासून सायली आणि विशाल एकमेकांपासून वेगळे झाले होते. त्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण नियतीने दोघांची भेट घडवून आणली नाही. पण अखेर आता सायली आणि विशाल एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे आता एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे दोघे पुन्हा एकत्र येणार का?, प्रेक्षकांना हवहवीशी वाटणारी लव्हस्टोरी पुन्हा नव्याने सुरु होणार का? की, सायली आणि विशाल यांच्या वाटा वेगळ्या होणार? हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेली आहे.
आणखी वाचा – सुखी संसाराची २५ वर्षे! लग्नाच्या वाढदिवसाला डॉ. नेनेंकडून माधुरी दीक्षितचं तोंडभरुन कौतुक, Unseen फोटो समोर
‘पाऊस’ या सीरिजमध्ये ‘सुंदरी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री आरती बिराजदारने सायली ही भूमिका साकारली आहे, तर आरतीला अभिनेता अक्षय खैरेची साथ मिळाली आहे. अक्षय खैरेसुद्धा आजवर अनेक मालिकांमध्ये विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पाऊस’ ही सीरिज आरती व अक्षय या मुख्य दोन भूमिकांच्या अवतीभवतीची असली तरी या सीरिजमध्ये इतर अनेक लोकप्रिय कलाकारदेखील पाहायला मिळाले.
आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये गायकांना मिळते कवडीमोल रक्कम, सुप्रसिद्ध गायकानेच आणलं सत्य समोर, म्हणाला, “पैसे मागितले तर…”
दरम्यान, ‘पाऊस’ची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांचे असून या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांची आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत. ‘पाऊस’ ही लोकप्रिय सीरिज ‘इट्स मज्जा’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलद्वारे सोमवार व गुरुवारी दुपारी १.३० वाजता प्रदर्शित होते.