मनोरंजन विश्वातला सर्वात लोकप्रिय व वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’चे नाव घेतले जाते. टीव्हीवरील हा लो लोकप्रिय शो ओटीटीद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. अशातच या लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन सुरु झाला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात २४ जूनच्या भागामध्ये नॉमिनेशन टास्क आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सर्वांना राहत्या जागेत बोलावून प्रत्येकी दोन नावे देण्यास सांगण्यात आले. आता या काळात दोन जणांना उमेदवारी मिळाली. एक नीरज गोयत, जो बॉक्सर आहे आणि दुसरी शिवानी कुमारी, जी व्लॉगर आहे. आता बातम्या येत आहेत की, आठवड्याच्या मध्यात यापैकी एकजण बेदखल होणार आहे.
‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये प्रत्येकी दोन स्पर्धकांना नॉमिनेट केले. परंतु केवळ त्या दोघांचीच बेदखल करण्यासाठी निवड करण्यात आली, ज्यांची नावे जनतेकडून देण्यात आली होती. याचा अर्थ, या आठवड्यात सना सुलतानने नामांकित केलेल्या दोघांचीच निवड करण्यात आली आहे. याचा नीरजला फारसा फरक पडला नाही कारण तो सुरुवातीपासूनच समजूतदारपणे वागत आहे आणि लोकांची मने जिंकत असतो. त्यामुळे या नॉमिनेशनमुळे शिवानीला धक्का बसला आहे.
Did Sana claim Shivani nahi hain show ke layak? Ya lag rahe hain false allegations?
— JioCinema (@JioCinema) June 25, 2024
Tune in to the #BiggBossOTT3 24 hrs Live Channel on JioCinema Premium now.#BBOTT3onJioCinema #BBOTT3#BiggBoss #JioCinemaPremium pic.twitter.com/cN3JekAORp
आणखी वाचा – बाप म्हणून कमी पडल्याची अर्जुनला जाणीव, अमोलला एकट्यालाच सोडल्यामुळे कोसळलं रडू, अप्पी विचारणार जाब
‘बिग बॉस ओटीटी ३’च्या नुकत्याच झालेल्या भागात दीपक चौरसिया आणि अरमान मलिक यांच्यात भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान शिवानी विनाकारण त्यांच्या भांडणात विनाकारण पडली. तिने दीपक चौरसियाला पाठिंबा दिला आणि ती ओरडू लागली. हे पाहून लोकांनी सांगितले की, तिला नॉमिनेट केले आहे म्हणून ती हे सगळं करत आहे.
आता प्रश्न असा आहे की, जर पहिल्या आठवड्यातच मध्यंतरी बेदखल झाले तर जाणार कोण? घरात १६ लोक आहेत आणि हा शो दीड महिना म्हणजेच ४५ दिवस चालतो. या ४५ दिवसांमध्ये ६ वीकेंड असतील आणि त्यांनी प्रत्येक आठवड्यात १ व्यक्ती काढल्यास १० लोक अंतिम फेरीत पोहोचतील. त्यामुळे, निर्माते आठवड्याच्या मध्यावर किंवा दुहेरी निष्कासनाचा अवलंब करतील. त्यामुळे आता शिवानी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.