बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सतत चर्चेत असते. ती नेहमी बेधडक व वादग्रस्त वकतव्यांमुळेदेखील ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी शाकाहारी ब्लॉगरला सुनावल्यामुळे चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिने सोनाक्षी सिन्हा व जहीर इक्बाल यांच्या लग्नावर भाष्य केले आहे. स्वराने देखील आंतरधर्मीय विवाह केला. आता सोनाक्षीही आंतरधर्मीय विवाह करत असल्याने स्वरा तिला पाठिंबा देत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. जाणून घेऊया स्वरा नक्की काय म्हणाली आहे ते. (swara bhaskar on sonakshi sinha)
सोनाक्षी व जहीर यांच्या लग्नाची चर्चा गेली खूप दिवस सोशल मीडियावर पहायाल मिळत आहे. या महिन्यात दोघंही लग्नबंधनात अडकतील अशी चर्चादेखील सुरु आहे. सोनाक्षी मुसलमान मुलाबरोबर लग्न करत असल्याने लोकांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली आहे. अशातच आता स्वराने या वदात उडी घेतली आहे. तसेच ‘लव्ह जिहाद’बद्दलच्या सर्व मिथकांबद्दल भाष्य केले आहे.
स्वराला सोनाक्षी व जहीर यांच्या नात्याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, “माझ्या लग्नादरम्यान समाजातील अनेक तज्ञांनी सल्ले दिले होते. पण आम्ही आता समजूतदार लोकांबद्दल बोलत आहोत. ते त्यांच्या खासगी आयुष्यात काय करत आहेत, ते लग्न करणार आहेत की नाहीत हे सगळं त्यांच्यावरच अवलंबून आहे”.
पुढे ती म्हणाली की, “जर ते एकत्र राहत असतील तर, कोर्टात लग्न किंवा निकाह करणार असतील किंवा आर्य समाजपद्धतीने लग्न करणार असतील तर त्यासाठी कोणालाही काहीही देणंघेणं नसावं. हे सगळं त्यांच्या कुटुंबा अंतर्गत असणारी गोष्ट आहे. हे सोनाक्षीचं आयुष्य आहे. तिने तिचा जोडीदार निवडला आहे आणि तिच्या जोडीदाराने तिला निवडलं आहे. हा त्यांचा खासगी प्रश्न आहे. या सगळ्यामुळे उगाचच चर्चा करुन लोक वेळ वाया घालवत आहेत”.
त्यानंतर ती म्हणाली की, “उद्या जर सोनाक्षी व जहीरचे लग्न झाले आणि त्यांचे मूल जन्माला आले तर त्या मुलाच्या नावावरुन अजून वाद सुरु होतील. हे कधीही संपणार नाही. सैफ व करीनाच्या मुलांच्या नावावरुन किती चर्चा झाली हे सगळ्यांनी पाहिलंच आहे”.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९ जून रोजी म्हणजे आह सोनाक्षी व जहीर यांचा संगीतसोहळा पार पाडणार आहे. तसेच २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.