‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेच कथानक पारूभोवती फिरताना दिसत आहे. अशातच वटपौर्णिमेनिमित्त पारू आदित्यसाठी वडाची पूजा करायचं ठरवते. आदित्यच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करण्याचा निश्चय ती करते, त्याचवेळी तिथे दिशा व दामिनी येतात. तेव्हा पारू बाजू सांभाळून त्यांना वेगळं काही बोलली असल्याचं सांगते. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये पारूच्या गळ्यातील मंगळसूत्राचं सत्य समोर आलेलं पाहायला मिळत आहे. (Paaru Serial Promo)
इकडे अहिल्यादेवी वडाची पूजा करतात ते पाहून पारू मनात म्हणते की, मी आदित्य सरांची बायको असूनही मी ही पूजा करु शकत नाही. पूजा झाल्यानंतर अहिल्यादेवी निघायचं असं म्हणून पुढे जातात. तेव्हा पारूच्या चैनमध्ये वडाची एक पारंबी अडकते आणि पारू पुढे जाते तेव्हा तिचं मंगळसूत्र बाहेर येतं. यावर पारू म्हणते, आता कसला संकेत आहे. आता मला ही पूजा करायलाच पाहिजे. आदित्य सरांच्या दीर्घायुष्यासाठी मला हे व्रत करावंच लागेल, असं म्हणत पारू वडाची पूजा करते.
तर इकडे घरी आल्यानंतर अहिल्यादेवी व श्रीकांत उपवास सोडत असतात. तेव्हा अहिल्यादेवी श्रीकांतच्या ताटातील उष्ट अन्न खाते. यावर श्रीकांत त्यांना थांबवतो. मात्र अहिल्यादेवी म्हणतात की, आज बायकोने नवऱ्याचं उष्ट खायचं असतं, अशी किर्लोस्करांची प्रथा आहे, असं म्हणत ते जेवू लागतात. त्यानंतर आदित्यही जेवत असतो. आदित्यचं जेवून झाल्यानंतर पारू त्याच ताट स्वयंपाकघरात घेऊन येते आणि आदित्यच्या ताटातील उष्ट अन्न खाते. त्यावेळी सावित्री मागे उभी राहून सर्व पाहत असते. त्याचवेळी पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र बाहेर येतं. आणि सावित्री घाबरुन म्हणते, पारू तुझ्या गळ्यात मंगळसूत्र. सावित्रीचा आवाज ऐकून पारूही घाबरते.
आता पारूच्या व आदित्यच्या लग्नाचं सत्य पारू सावित्रीला सांगणार का?, सावित्री पारूची बाजू सांभाळून घेणार का?, हे सर्व मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे.