बॉलीवुड अभिनेता नसीरुद्दीन शाह हे मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. याबरोबरच त्यांनी नाटकांमध्येही काम केले आहे. मात्र ते अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यातील घटनांवरही ते नेहमी व्यक्त होत असतात. अनेकदा ते देशातील, समाजातील विषयांवर आपले परखड मत मांडत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या नवीन विधानांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी एका मुलाखतीमध्ये देशातील मुसलमान ते देशाचे पंतप्रधान यांच्याबद्दल भाष्य केले आहे. याबद्दल आता चर्चा सर्वत्र होत आहे. (naseeruddin shah on pm narendra modi)
नसीरुद्दीन हे त्यांच्या वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. अशातच त्यांनी आता नरेंद्र मोदी व देशातील मुसलमान यांच्याबद्दल भाष्य करत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी देशातील मुसलमानांच्या हिजाब व सानिया मिर्झाच्या स्कर्टबद्दल विचार मांडण्याऐवजी शिक्षणासंबंधित चर्चांवर अधिक भर द्यावा. त्यांनी मुलाखतीमध्ये म्हंटले की, “एखाद्या दिवशी पंतप्रधानांना इस्लामिक टोपी घातलेली बघायला आवडेल. यामुळे देशातील मुसलमानांच्या मनात असलेला मोदींबद्दलचा गैरसमज दूर होईल. नरेंद्र मोदी यांच्या मनात मुसलमानांबद्दल कोणताही राग नाही”.
पुढे ते म्हणाले की, “जर मोदी यांनी मुसलमानांना राजी करु शकले तर याचा त्यांना केला. गेल्या काही वर्षांपासून मोदी कमी समजूतदारपणा दाखवला आहे. ते स्वतःला देव मानत आहेत. त्यामुळे सगळ्यांनीच सावध राहा. ते आता आयुष्यभर प्रधानमंत्री राहतील असे मोदींना वाटले होते. मात्र त्यांनी आता सत्ता सोडावी. त्यांच्यासाठी हे कठीण असेल”.
त्यानंतर ते म्हणाले की, “जेव्हा भाजपाने बहुमत गमावले तेव्हा त्यांना समजले की गेल्या १० वर्षांपेक्षा त्यांची सध्याची स्थिती खूप खराब आहे. तेव्हा त्याबद्दल आनंद व्यक्त करावासा वाटला”. त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, मोदींसाठी आता झालेला बदल ते स्वीकारतील का?, त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “हे पंतप्रधानांसाठी खूप कठीण होऊ शकते. ते इतके चांगले अभिनयदेखील करत नाहीत. त्यांचे हास्य व खोटे अश्रु या सगळ्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. ते नवीन मोदी होण्याचा अभिनय करु शकत नाहीत”.
तसेच त्यांनी सांगितले की, “मुसलमानांच्या मदरश्यांऐवजी शिक्षण व नवीन विचारांवर चर्चा व्हावी. मोदींचा विरोध करणे खूप सोपे आहे. खरं तर हे आहे की मोदी येण्याच्या आधीही देशात खूप काही चुकीचं होत होतं. आपल्या देशात पहिल्यापासूनच धर्मामध्ये खूप तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे”.
दरम्यान नसीरुद्दीन यांच्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियामध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे.