टेलिव्हिजन अभिनेत्री दलजित कौर ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेऊन तिने निखिल पटेल या व्यावसायिकाबरोबर लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या काही कालावधीनंतर लगेचच तिच्यामध्ये व निखिलमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. तिने निखिलवर अनेक आरोपदेखील केले आहेत. पण त्यावर निखिलने मात्र अधिक प्रतिक्रिया न देता ती स्वतः घर सोडून गेल्याचे त्याने सांगितले. पण या आधी ती शालीन भानोतबरोबर घेतलेल्या घटस्फोटामुळेही खूप चर्चेत आली होती. पण शालीन व दलजित का वेगळे झाले? त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया.(shalin bhanot and dalljiet kaur divorce)
मागील वर्षी मार्च महिन्यात निखिलबरोबर लग्न केले. लग्नानंतर तिचे आयुष्य चांगले जगेल असे वाटले होते. मात्र लग्नानंतर दहा महिन्यातच तिच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. ती केन्यावरुन पुन्हा भारतात परतली. निखिलचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचे दलजितच्या पोस्टवरुन लोकांनी अंदाज बांधले. पण याआधी शालीनबरोबर घटस्फोट घेत होती तेव्हा देखील हा मुद्दा मोठा झाला होता.
एका मालिकेदरम्यान शालीन व दलजित यांची ओळख झाली होती. यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. खूप वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर तीन वर्षांनी दोघांना एक मुलगा झाला. पण मुलाच्या लग्नानंतर दोघांमधील दुरावा कमी होण्याऐवजी वाढला. दलजितने शालीन व त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर २०१५ म्हणजे लग्नानंतर सहा वर्षातच लग्न मोडले.
याबाबत दलजितने सांगितले की, “आम्ही घटस्फोट घेत आहोत हे खरे आहे. शालीनच्या आईने लग्नानंतर बोलणे बंद केले होते. त्या लग्नामध्ये मिळालेल्या गिफ्टमुळे खुश नव्हत्या. आमच्या लग्नाच्या दुसऱ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच समस्या येण्यास सुरुवात झाली होती. माझ्या सासूबाईनी माझ्याशी बोलणे पूर्णच बंद केले होते. आमची घरची परिस्थिती वेगळी होती. आम्ही तीन बहिणी असल्याने माझ्या वडिलांना महागड्या भेटवस्तू घेणे परवडले नसते”. शालीन व दलजितचा मुलगा दलजितकडेच असून ती त्याचा खूप प्रेमाने सांभाळ करत आहे.