5 Reasons to watch aarpaar : सध्या मराठी चित्रपटांची सिनेमागृहांमध्ये रांग लागली आहे. अशातच ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरचा आरपार हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनातून आरपार व्हायला सज्ज झाला आहे. १२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अर्थात ट्रेलर, पोस्टर, टिझर आणि गाण्यांनी चित्रपटाची उत्सुकता वाढविली होतीच पण हो सिनेमा चित्रपटगृहात आलाय आणि साऱ्यांचं मन जिंकतोय. तुम्ही अजून पाहिला नाही का हा सिनेमा. चिंता नसावी, हा सिनेमा प्रेक्षकांनी का पाहावा याचे टॉप ५ रिझन्स मी आज तुम्हाला सांगणार आहे…चला तर मग सुरुवात करूया.
ललित-ऋता अभिनय
ललित आणि ऋताचा वाढदिवस हा १२ सप्टेंबरला आहे आणि दोघांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणायला हवी, हा चित्रपट त्यांच्या प्रत्येक चाहत्याने वाढदिवसाची भेट म्हणून नक्कीच पाहायला हवा. याशिवाय बोलायचं झालं तर दोघांचा अभिनय अर्थात वाखाणण्याजोगा आहे. आरपारमध्ये त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी भन्नाट दाखविली आहे की ते खरंच रिअल कपल आहेत की काय असं वाटत आहे. त्यांच्यातील प्रेम, भांडण या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत असं चित्रपट पाहताना सतत वाटत होतं. यांत अजून एक मुद्दा ऍड करावा वाटतोय तो म्हणजे ललित चित्रपटांच्या बाबतीत म्हणजेच चित्रपटाची निवड करण्यात तो खूप choosy आहे. तर त्याने हा चित्रपट निवडला आहे याचा अर्थ हाच की या चित्रपटात नक्कीच काहीतरी खास बात आहे. ललितच या चित्रपटातील बॉडी ट्रान्सफरर्मेशन पाहण्यासारखं आहे तर ऋताचा ग्लॅमरस चेहरा आजही या चित्रपटात तसाच आहे. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता मोहक वाटतेय. शूट करताना दोन्ही कलाकारांना फिझिकल आव्हान होती ती त्यांनी अगदी अचूक पार पाडली आहेत.
संगीत
हा चित्रपट पाहण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे संगीत. बाप संगीत आहे. दिग्गज गायकांची फौज या चित्रपटातील गाण्यांना लाभली आहे. शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, आनंदी जोशी, अंकिता जोशी, गुलराज सिंग यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. गुलराज सिंग यांचं संगीत म्हणजे सोने पे सुहेगा. गाण्यांसाठी हा चित्रपट खरंच पाहावा. या चित्रपटात एक जागरण गोंधळ हे गाणं आहे. सुरु झालं तेव्हा अंगावर काटा आला. असा गोंधळ आतापर्यंत मी तरी ऐकला नाही. डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गोंधळ गाणं साऱ्यांना थक्क करणार आहे.
दिग्दर्शन
चित्रपटात काहीतरी दाखवायचं म्हणून थुकरट न दाखवता mature लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. आजवर आपण पाहत आलोय की अनेकदा दोन प्रेमीयुगुल एकत्र येतात आणि प्रेम होतं किंवा त्यांच्यात दुरावा येतो आणि ती कथा संपते. हा तोच तोच रटाळपणा या सिनेमाच्या कथानकात नाही आहे. गौरव पतकी यांनी अगदी विचारपूर्वक अशी लव्हस्टोरी लिहिली आहे आणि ती पडद्यावर मांडली आहे. पडद्यावर दिसणारा प्रत्येक कलाकार एका चौकटीत दिग्दर्शकाने बांधला आहे.
आणखी वाचा – “हा पूर्णविराम नाही”, मालिकेच्या निरोपावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “या माणसांशी…”
संवाद
प्रत्येक चित्रपटातील संवाद हे लक्षवेधी असतात. त्याचप्रमाणे या चित्रपटातील संवादही खूप स्पष्ट आणि ऐकत राहण्यासारखे आहेत. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’ आणि ‘प्रेमात वेड लावायची ताकद असते फक्त पार्टनर चांगला मिळायला हवा’ अशा काही ओळी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. राग, प्रेम याची भाषा अगदी उत्तमरीत्या आणि सहज सोपी असल्याने प्रत्येकाला कळणारी आहे. तरुण पिढीच्या जवळचे हे संवाद आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
सिनेमॅटोग्राफी
एखाद्याने पाहताना ती स्क्रीन इतकी नीटनेटकी आणि सुंदर दिसावी यासाठी प्रत्येक डीओपी मेहनत घेतो. दिग्दर्शकाच्या नजरेतून जरी हा चित्रपट शूट होणार असला तरी डीओपीचे प्रामाणिक मत यांत अग्रस्थानी आहे. आरपारच्या डीओपीने प्रत्येक सीन अगदी larger then life ठेवला आहे, चित्रपटात शेवटी एक ललित ऋताचा सीन आहे ज्यात ते एका उंच डोंगरावर पाठमोरे उभे असतात, तो सीन ज्या पद्धतींने त्यांनी शूट केलाय लाजवाब. कलाकारांचे भाव इतके अचूक टिपले आहेत की पाहताच मन भरून येतंय.





