मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे वैभव मांगले. ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘अलबत्या गलबत्या’ यांसारख्या अनेक नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याशिवाय, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यपती’सारख्या मालिका व ‘काकस्पर्श’, टाईमपास’, ‘शाळा’, ‘कुटुंब’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या विविधांगी भूमिका करत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या विविधांगी भूमिकांबरोबरच वैभव मांगले हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांसह विविध फोटोज व व्हिडीओ शेअर करतात. शिवाय, ते विविध मुद्द्यांवरही परखडपणे भाष्य करताना दिसतात. अशातच त्यांनी नुकताच त्यांच्या पत्नीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वैभव मांगले यांनी हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘ये कहां आ गये हम’ हे गाणं लावलं आहे. या व्हिडीओखाली त्यांनी “आज आमचं लग्न १८ वर्षांचं झालं” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – तन्वीने दिली आत्महत्येची धमकी, अर्जुनने या सगळ्याला पूर्णा आजीला धरलं जबाबदार, सायली मिटवू शकेल का हा अबोला?
वैभव मांगले हे कोकणातील असून याआधी त्यांनी अनेकदा त्यांच्या गावचे व्हिडीओ शेअर केले आहेत. वैभव मांगले हे सध्या त्यांच्या गावी कोकणात गेले असून तिथे ते त्यांच्या पत्नीसह कोकणातील पावसाचा व निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत आणि याचेच काही खास क्षण त्यांनी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. त्यामुळे वैभव यांनी त्यांच्या पत्नीबरोबर शेअर केलेला व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडत आहे.
दरम्यान, वैभव मांगले यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना व त्यांच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे म्हटले आहे.