abhijit amkar shares post : मालिकाविश्वातील कथानक हे प्रेक्षकांचं भरभरुन मनोजनं करत आलं आहे आणि करत आहे. या मालिकांमुळे कलाकारांना नेहमीच प्रसिद्धी मिळते. मात्र एवढी लोकप्रियता मिळवण्यासाठी कलाकारांनाही तेवढीच मेहनत करावी लागते. मालिकेचा एक भाग २५ ते ३० मिनिटांचा असतो. पण तोच भाग चित्रीकरण करण्यासाठी अनेक तास व दिवस लागतात. यामागे कलाकारांची खूप मेहनत असते. दिवस-रात्र, ऊन-वारा, पाऊस काहीही न पाहता ही कलाकार मंडळी घरापासून, कुटुंबापासून दूर राहत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. यांत बरेचदा या कलाकारांना बरं नसतं, मात्र आपल्यामुळे शूटिंग थांबू नये वा इतर टीमची हेळसांड होऊ नये म्हणून उपचार घेत हे कलाकार शूटिंगला हजेरी लावतात.
मालिकाविश्वातील टीआरपीच्या शर्यतीत राहण्यासाठी कलाकारांसह संपूर्ण मालिकेच्या टीमला खूप मेहनत करावी लागते. बरेचदा कलाकारांना मालिकेतील विशेष भाग शूट करण्यासाठी पुरेशी झोप मिळत नाही व त्याशिवाय वेळेवर जेवण ही करता येत नाही. अशातच ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतील अर्णवची भूमिका साकारणारा अभिनेता अभिजित आमकरने याच मालिकेतील मेहनतीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. मालिकेतील मोठ्या ट्विस्टमुळे लग्नाच्या सीनचं शूटिंग सुरु आहे. आणि हे शूटिंग करतानाची त्याची झालेली धावपळ आणि मेहनत त्याने पोस्टमधून शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये अभिजीत म्हणतो, “अरे बापरे… किती धावपळीचा आठवडा होता. खूप गडबड, गोंधळ आणि खूप थकवणारा, पण तरीही तितकाच सुंदर. या लग्नाच्या शूटमध्ये सगळं होतं. अगदी लाइट्स होते, ड्रामा होता आणि खूप कमी झोपही. काही दिवस मी अगदीच गोंधळलेलो होतो, पण अखेर मला माझा सूर सापडला. मालिकेतील सीन, त्यातील भावभावना आणि वास्तविक आयुष्य एकत्र सांभाळत मी मल्टिटास्किंग करीत राहिलो”.
आणखी वाचा – अभिषेक देशमुखकडून बायकोचं तोंडभरुन कौतुक, मालिकेतील पदार्पणाआधी दिला सल्ला, म्हणाला, “फक्त स्पर्धा…”
पुढे अभिनेत्याने म्हटलं, “हो. खूप थकलो. पण जेव्हा मला मी स्वतःसाठी उभं राहू शकत नाही, असं वाटलं तेव्हा मला मनाला धीर आणि आधार देणारे काही लोक अनपेक्षितरीत्या भेटले. मनाला शांतता मिळाली. खूप भारावून गेलो होतो. जणू देवानंच त्यांना देवदूत म्हणून पाठवलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचच मनापासून आभारी आहे. कृतज्ञ आहे. असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि रोज मालिका पाहत राहा”, असं लिहीत त्याने भावना व्यक्त केल्या.





