‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, इकडे सायली अर्जुनच्या प्रेमात आकंठ बुडालेली असते. ती अर्जुनचा फोटो घेऊन त्याच्याकडे पाहत असते आणि खूप खुश असते तितक्यात तिथे कल्पना येते. कल्पनाला घेऊन सायली नाचू लागते आणि म्हणते की, आज मी खूप खुश आहे. तुम्ही माझी काहीच काळजी करू नका. त्यानंतर दोघेही जेवण बनवायला खाली जातात. तर इकडे चैतन्य अर्जुनला भेटायला आलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की, तन्वीपर्यंत हे सत्य आलंच कसं?, तेव्हा चैतन्य सांगतो की, मी सांगितलं म्हणजे मी तन्वीला नाही सांगितलं तर मी रागाच्या भरात एके दिवशी साक्षीला बोलून गेलो की तुझं आणि सायलीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. हे लग्न खरं नाही. (Tharal Tar Mag Serial Update)
हे ऐकल्यावर अर्जुनचा पारा चढतो अर्जुन चैतन्यवर ओरडू लागतो. तेव्हा चैतन्यला रडू येतं. चैतन्य म्हणतो की, मी आजवर खूप चुका केल्या आहेत. मला असं वाटते की मी सुद्धा कुणाल सारखं… इतकंच बोलतो तितक्यात अर्जुन चैतन्यच्या कानाखाली मारतो. आणि त्याला जवळ घेतो. चैतन्य म्हणतो पुन्हा असं बोलायचं नाही आणि तुझ्यावर तर ही वेळ आलीच नाही पाहिजे. त्यानंतर अर्जुन चैतन्यला समजून घेतो. तर इकडे प्रिया साक्षीकडे आलेली असते आणि ती म्हणते की, तू हे सगळं काही मला खोटं सांगितले की सायली व अर्जुनच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. मी तोंडावर पडले. पूर्णा आजीसमोर मी तोंडावर पडले. पूर्णा आजीने चैतन्यला फोन केला होता मात्र चैतन्यने हे सगळं खोटं असल्याचं सांगितलं. आणि त्यांचं लग्न खरं असल्याचं सांगितलं. हे ऐकल्यावर साक्षी विचार करू लागते की, चैतन्यने असं का केलं असेल. आता एवढं मात्र नक्की आहे की सायली व अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि याचे पुरावे नक्कीच कुठेतरी लिखित स्वरूपात असणार ते आपल्याला शोधून काढावेच लागतील, मग आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. तर इकडे सायली अर्जुनसमोर प्रेम कसं व्यक्त करायचं याबाबत विचार करत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की, आपण जर एकमेकांना पत्र लिहिलं आणि प्रेम व्यक्त केलं तर ते जास्त सोयीस्कर होईल म्हणून ती पत्र लिहून ठेवते.
तर इकडे चैतन्य अर्जुनला आठवण करून देतो की, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये एक क्लाज असा आहे की, मधु भाऊ सुटून येईपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पडायचं नाही किंवा तुम्हाला एकमेकांबद्दल फीलिंग सुद्धा वाटता कामा नये तर प्रेम दूरच राहिलं, हे लक्षात आल्यावर अर्जुन म्हणतो. अरे हा क्लॉज मी टाकला होता आणि आता मीच याच्यात अडकलो आहे. त्यानंतर अर्जुन ठरवतो की मी आता माझं हे प्रेम लपवून ठेवणार काही झालं तरी चालेल पण हे प्रेम लपवून ठेवावच लागेल नाही तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुटलं म्हणून सायली मला सोडून जाईल.
त्यानंतर सायली अर्जुनला फोन करते तेव्हा अर्जुन सायलीवर भडकतो आणि म्हणतो की, मी ऑफिसमध्ये आहे. आणि ऑफिसमध्ये मी कामातच असणार ना, तुम्ही मला सारखासारखा का फोन करत आहात, असं म्हणतो आणि एकीकडे मनात म्हणतो की, सायली मला तुला दुखवायचं नाही आहे पण मला दुखवावं लागतंय. तर इकडे सायली घाबरून फोन ठेवून देते. आता सायली व अर्जुनमध्ये या क्लॉजमुळे दुरावा येणार का?, साक्षी या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे शोधणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.