लहान पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता रणदीप हुड्डा याने केलेले असून तो या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकाही त्याने साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील सर्वांच्याच भूमिकेचे कौतुक केले जात आहे. अशातच आता अंकिता बाबत एक वृत्त ऐकायला मिळत आहे. चित्रपट करण्याआधी तिने निर्मात्यांसामोर एक अट ठेवली होती. त्याबाबत आता निर्मात्यांकडून खुलासा करण्यात आला आहे. (movie producers on ankita lokhande )
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अंकिताने अभिनयविश्वात पदार्पण केले.त्यानंतर तिने इतर मालिका व रिॲलिटी शोच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता ती ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामध्ये ‘यमुनाबाई’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सावरकरांची पत्नी यमुनाबाई हे पात्र साकारण्यासाठी तिने एकही रुपया घेतला नसल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे.
चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी सांगितले की, “अंकिताने या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतले नाही. तिला जेव्हा या भूमिकेसाठी विचारले गेले तेव्हा तिने या चित्रपटात भूमिका करण्यासाठी एकही रुपया घेणार नसल्याची अट ठेवली”. तसेच पुढे ते म्हणाले की, “आम्ही जेव्हा ही भूमिका घेऊन तिच्याकडे गेलो तेव्हा मात्र तिने चित्रपटाची कहाणी व तिची भूमिका न ऐकताच चित्रपटासाठी हो म्हणाली”.
हा चित्रपट बनवण्यासाठी २० ते २५ कोटी रुपये खर्च आला आहे. यामध्ये सावरकरांची भूमिका करण्यासाठी रणदीपने आपले तब्बल २६ किलो वजन घटवले. त्याचे ही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झाले. चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला असून ६ दिवसांमध्ये या चित्रपटाने १०.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती हिंदी रिॲलिटी शो ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसून आली होती. या शोमध्ये तिच्याबरोबर तिचा पती विक्की जैनदेखील दिसला होता. अंकिता व विक्कीचे भांडणदेखील खूप झाले होते. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या.