दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या खूप चर्चेत आली आहे. नितेश तिवारीच्या ‘रामायण’ या चित्रपटात ती सीता मातेची भूमिका साकारत आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा पहिला लूक सोशल मीडियावर लिक झाला होता. आता त्यामुळे तिचे चाहते तिच्या चित्रपटाची खूप वाट बघत आहेत. मात्र आता ती तिच्या अभिनय किंवा चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सीतामातेची भूमिका साकारण्या साईपल्लवीने मांसाहार सोडल्याचे समोर आले आहे. मात्र साई पल्लवीने स्वतः या सगळ्या प्रकणावर भाष्य केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याबद्दल सांगितले आहे. (sai pallavi on vegeterian statement)
‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर यावरुन अनेक वाददेखील निर्माण झाले होते. या चित्रपटात सीतामातेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडल्याचे म्हंटले गेले. मात्र या सगळ्या चर्चाना आता अभिनेत्रीने स्वतःच पूर्ण विराम दिला आहे. बुधवारी साई पल्लवीने ‘एक्स’ या सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे.
Most of the times, Almost every-time, I choose to stay silent whenever I see baseless rumours/ fabricated lies/ incorrect statements being spread with or without motives(God knows) but it’s high-time that I react as it keeps happening consistently and doesn’t seem to cease;… https://t.co/XXKcpyUbEC
— Sai Pallavi (@Sai_Pallavi92) December 11, 2024
तिने लिहिले की, “अनेकदा, म्हणजे प्रत्येक वेळी कोणत्याही अफवा आजकाल ऐकायला मिळतात. या अफवा माहीत नाही का पण खूप पसरतात. पण अशावेळी मला शांत राहायला बरं वाटतं. पण आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. हे सुरुच राहतं. खासकरुन तेव्हा जेव्हा माझ्या चित्रपटाची घोषणा, प्रदर्शन किंवा एखादी महत्त्वाची वेळ असते. पण यापुढे जेव्हा मी पेज, मीडिया किंवा कोणाही व्यक्तीला अशा अफवा पसरवताना पाहिलं किंवा बातम्या आणि गप्पा मारताना मी ऐकलं तर तुम्हाला मी कायदेशीर रित्या सामोरी जाईन”.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, साई पल्लवी ही शाकाहारी आहे. एका मुलाखतीमध्ये तिने याबद्दलचा खुलासा केला होता. ती म्हणाली की, “मी नेहमी शाकाहारी जेवते. एखादा जीव मरतो तेव्हा मी बघू शकत नाही”. दरम्यान साई पल्लवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती आता ‘अमरन’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती.