‘शार्क टँक इंडिया’ या शोमधून परीक्षक आणि ‘शादी डॉट कॉम’चे संस्थापक, सीईओ अनुपम मित्तल यांनी आजवर बरीच लोकप्रियता मिळवली आहे. याशिवाय, अनुपम हा त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे आणि तो अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याची झलक शेअर करताना दिसतो. मात्र, अनुपमलाही त्याच्या वयाच्या २०व्या वर्षी आर्थिक व मानसिक समस्यांशी झुंज द्यावी लागली. आता एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे. (Shark Tank India Judge Anupam Mittal)
अनुपम मित्तलने अलीकडेच रणवीर अल्लाबदियाच्या एका पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या आयुष्यबाबत भाष्य केलं. अनुपम याने त्याच्या आयुष्यातील चढ-उतरांबाबत भाष्य केलं. नोकरीऐवजी व्यवसायात जाण्याचा विचार केव्हा केला याबाबत त्याला विचारण्यात आले. त्याबद्दल बोलताना अनुपम म्हणाला की, “पूर्वी त्याचं काम आणि साधं आयुष्य होतं, पण याच गोष्टीने त्याला सगळ्यात जास्त घाबरवलं होतं. त्याऐवजी, त्याला आयुष्यात मोठी कामे करायची होती”.
या संवादात अनुपम यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या प्रवासाची आठवणीही सांगितली. याबद्दल बोलताना त्या वेळेबद्दल तो म्हणाला, जेव्हा त्याने आपली नोकरी गमावली, जी त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट वेळ ठरली. यानंतर, त्याने त्या वेळी चिंता आणि दहशतीच्या काळात कसा सामना केला हे देखील शेअर केले. अनुपम म्हणाला, “२५ वर्षांपूर्वी माझी अमेरिकेतील नोकरी गेली, मी खूप कर्जात बुडालो होतो आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. तेव्हा मला माझा पहिला पॅनिक अटॅक आला आणि ही सर्वात वाईट गोष्ट होती. बऱ्याच लोकांना मानसिक आरोग्य समस्या समजत नाहीत परंतु याबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे”.
अनुपम मित्तल यांनी अभिनेत्री आंचल कुमारशी लग्न केले आहे. आंचल ‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनचा एक भाग होती. या जोडप्याने २०१३ मध्ये लग्न केले आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव एलिसा ठेवले.