‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपाली इंद्राणीविरुद्ध तिच्या प्रतिबिंब शक्तीचा वापर करत असते. मात्र नेत्रा मध्ये आल्याने रुपालीला इंद्राणीविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा येत नाही. अशातच नेत्रा, इंद्राणीसह अद्वैत व शेखर रुपालीच्या या शक्तीबद्दल सतर्क होतात. त्यामुळे रुपाली आता अस्तिकट्यार मिळवण्यासाठी शेखर राजाध्यक्ष विरुद्ध त्या प्रतिबिंब शक्तीचा वापर करण्याचा विचार करते. त्यानंतर नेत्रा व अद्वैत फाल्गुनीला रुपालीच्या खोलीत पाठवण्याचा विचार करत असतात. फाल्गुनी सध्या घरात ज्याप्रमाणे वागत आहे ते सगळं रुपालीमुळे होत असल्याचा त्यांना संशय आहे.
दुसरीकडे फाल्गुनी मात्र तिने नेत्राला ज्यूस दिला नसल्याचे वारंवार म्हणत आहे. मात्र तिच्यावर कुणी विश्वास ठेवत नसल्याने ती अचूक वेळापत्रक सांगत केतकी काकू यांना तिने नेत्राला ज्यूस न दिल्याचे तसेच ती तेजसशी फोनवर बोलत असताना तिने केतकी काकू यांना आवाज दिल्याचेही अगदी अचूक वेळेसह सांगते. खरंतर फाल्गुनी व केतकी काकू यांच्या प्रतिबिंबमुळे त्यांच्यात हा गोंधळ झाला आहे. हाच गोंधळ निस्तरण्यासाठी त्या दोघी नेत्राकडे जातात. मात्र ती झोपली असल्याने अद्वैत त्यांना सकाळी बोलावं असं म्हणतो. त्यानंतर त्या दोघी पुन्हा परतून येताना याबद्दल नेत्राच काय तो निर्णय घेईल असं म्हणतात.
आणखी वाचा – “‘गल्ली बॉय’ चित्रपटामुळे माझे नुकसान”, रॅपर नेझीचा मोठा खुलासा, म्हणाला, “नकारात्मक नजरेने…”
त्यानंतर रुपाली शेखरला बेशुध्द करून त्याच्यावर प्रतिबिंब शक्तीचा वापर करते. त्यानंतर शेखर लगेच नेत्रा-अद्वैतच्या खोलीत येऊन अस्तिकट्यार लपवण्यासाठी सांगतो. मात्र नेत्रा-अद्वैत शेखरला अस्तिकट्यार इंद्राणीकडे असल्याचं सांगतात. त्यानंतर ते तिघे लगेच इंद्राणीच्या खोलीत जातात. ती कट्यार विरोचकापासून लपवून ठेवण्यासाठी शेखर कट्यारीला एके सुरक्षित ठिकाणी ठेवायला सांगतो. यावर इंद्राणी त्यांना आता घाई करायला नको असं म्हणते. मात्र शेखरचे प्रतिबिंब ती कट्यार मिळवण्यासाठी इंद्राणीकडे हट्ट धरतो.
आणखी वाचा – कन्या, मेष व मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस शुभ, व्यवसायात प्रगतीची शक्यता, जाणून घ्या…
एकीकडे शेखरचे प्रतिबिंब कट्यार मिळवण्यासाठी धडपड करत आहे तर दुसरीकडे ते प्रतिबिंब नष्ट होऊन त्याविषयी कुणाला काही कळू नये यासाठी रुपाली चिंतेत आहे. शेखर अस्तिकट्यारसाठी वारंवार इंद्राणीकडे हट्ट करत असल्यामुळे इंद्राणीला शेखरच्या वागण्यावर संशय येत आहे. त्यामुळे आता विरोचकाच्या हाती कट्यार लागणार का? की नेत्रा, इंद्राणी यांना त्या प्रतिबिंब शक्तीविषयी माहिती होणार? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.