एखादी मालिका प्रेक्षकांच्या इतकी पसंतीस पडते की प्रेक्षक ही त्या मालिकेवर प्रेम करू लागतात. मालिकेचं कथानक, मालिकेतील पात्रे ही काही दिवसांनी चाहत्यांच्या जवळची होऊन जातात. मालिकेचा चाहतावर्ग हा मालिकेवर भरभरून प्रेम करणारा असतो. मात्र जेव्हा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी बातमी समोर येते तेव्हा मात्र प्रेक्षकांना धक्काच बसतो. अशातच प्रेक्षकांनी चार वर्ष भरभरून प्रेम केलेली एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातमीने प्रेक्षकांना धक्काच बसला आहे.(Reshma Shinde On Rang Maza Vegla)
स्टार प्रवाह वाहिनीवरील काही दिवसांपूर्वी ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका ऑफ एयर गेली. तिच्या पाठोपाठ आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला होता. आता मात्र ही मालिका निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावरून भावुक पोस्ट शेअर करत मालिकेला मिस करणार असल्याचं म्हटलं आहे.
मालिका ऑफ एयर जाणार यानिमित्त दीपा म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने ‘इट्स मज्जा’ ला मुलाखत दिली. यावेळी ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तिला विचारलं गेलं की, ‘सेटवरची एक अशी गोष्ट जी तुझ्या कायम लक्षात राहील, ती कोणती?”
आणखी वाचा – हास्यजत्रेतील कलाकारांकडून प्राजक्ताला खास गिफ्ट म्हणाली “नवीन फार्महाऊस….”
यावर उत्तर देत रेश्मा म्हणाली की, “लंच टाइम. हा मला कायम लक्षात राहील आहे. जेव्हा सेटवर लंच टाइम होतो तेव्हा आम्हाला खूप मज्जा येते. असा कुठलाच दिवस नाही की, आम्ही लंच टाइम एकत्र नसतो. कोणी कोणाशी भांडू दे, चिडू दे, रुसवे फुगवे असू दे किंवा कोणाच्या तरी वैयक्तिक जीवनात काही घडलं जरी असेल तरी कधी कोणीच लंच टाइम मीस केला नाही. आमच्या तिथे खूप गप्पा होतात. म्हणून आम्ही सरांना सांगतही असतो की, वेळेत ब्रेक करा वगैरे. त्यामुळे मालिका संपल्यानंतर हा गोष्टीची मला खूप आठवण येईल.”