सध्या सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसऱ्या सिझनची चर्चा सुरु आहे. प्रेक्षक या रिऍलिटी शोला भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. बिग बॉस OTT ३ मध्ये एकूण १६ स्पर्धक होते. पण आता घरात १४ स्पर्धक उरले आहेत. नीरज गोयत व पायल मलिक यांना घराबाहेर पडावं लागलं. पायल मलिक ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर चर्चेत आहे. नुकतीच तिने ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. यामध्ये पायलने अरमान व कृतिकाबरोबरच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. पायल मलिक, तिचा पती अरमान मलिक आणि अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक हे तिघेही बिग बॉस ओटीटीमध्ये एकत्र पोहोचले होते. तिघेही त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अरमान या नावामुळे अनेकांना वाटते की ते मुस्लिम आहेत किंवा त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे. मात्र,पायल मलिकने अशा अफवा फेटाळून लावल्या आहेत. ती म्हणाली, नाही, असं अजिबात नाही. तो मुस्लिम नाही आणि त्याने इस्लामचा स्वीकारही केला नाही. अरमान हिंदू जाट कुटुंबातील आहे. (payal malik on arman malik second wedding)
अरमानने पहिले लग्न पायलशी केले. यानंतर त्याचे दुसरे लग्न कृतिका मलिकबरोबर झाले. तुम्हाला न्याय मिळाला का, असे विचारले असता?. यावर पायलने मुलाखतीत सांगितले की, “हा अन्याय आहे, मी अरमान जीसाठी माझे घर सोडले होते आणि आठ वर्षांपासून त्यांच्यावर अवलंबून होते. त्यांच्याबरोबरचं राहत होते. त्यांच्या आयुष्यात अचानक दुसरे कोणी आले तर माझ्यावर अन्याय झाला. पण त्याचबरोबर, सर्वांना हेदेखील माहित आहे की, आज आणि भविष्यातदेखील अरमान मलिकसाठी प्रथम पायल मलिक आहे आणि नंतर कृतिका आहे. कृतिकालाही हे माहीत आहे आणि आमच्या कुटुंबालाही हे माहीत आहे. अरमानची पहिली प्राथमिकता पायल आहे”.
पायलने दुसऱ्या लग्नानंतरही अरमानबरोबर राहण्याचे कारण सांगितले. ती म्हणाली, “फक्त प्रेम आणि माझा मुलगा चिकू. त्याच्यामुळे मी माझ्या दुसऱ्या लग्नानंतरही जगत आहे आणि खूप आनंदी आहे. मी असेच करत राहीन. मला राहण्याची सक्ती आहे किंवा मला राहावे लागेल असे नाही. ही माझी निवड आहे. माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आहे आणि ती त्या नात्यात राहत आहे, यावर कोणत्याही स्त्रीचा विश्वास बसणार नाही, कारण पैसा कितीही असला तरी पैशाने काही फरक पडत नाही. मी त्या नात्यात आहे ही माझी निवड आहे आणि मी त्यात खूप आनंदी आहे”.
पुढे ती म्हणाली, “माझ्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात एक मुलगी आली आहे जिने मला प्रथम स्थान दिले आहे. ती म्हणजे कृतिका. ती माझ्यावर अरमानपेक्षा जास्त प्रेम करते. मी काहीही बोलले तरी ती त्याचं वाईट वाटून घेते. ती माझ्याशी वाद घालत नाही. मी माझ्या घरातील बॉस महिला आहे, माझे घर मी चालवते. मी जे म्हणते तेच घडते. सुदैवाने सवत म्हणून भांडण करणारी मुलगी आली नाही. यासाठी मी देवाचे आभार मानते”.