‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारूचा साखरपुडा होत असतो तेव्हा हरीश पारूला अंगठी घालतो मात्र पारू हरिशला अंगठी घालणार इतक्यात ती अंगठी खाली पडते आणि आदित्यच्या पायाजवळ येऊन थांबते. त्यानंतर आदित्य ती अंगठी उचलतो आणि पारुला देतो. पारू व हरीश एकमेकांच्या हातात अंगठी घालतात आणि त्यांचा साखरपुडा संपन्न होतो. त्यानंतर सर्वप्रथम पारू आणि हरीश अहिल्यादेवी व श्रीकांत यांचे आशीर्वाद घेतात. त्यानंतर दिशा आणि दामिनी पारुला टोचून बोलतात म्हणतात की, आता लवकरच लग्न कर आणि या घरातून निघून जा आणि लग्न सुद्धा तू किर्लोस्करांच्या जीवावरच करशील ना?, असं बोलून तिथून निघून जातात. अशा रीतीने हरिष व पारू यांचा साखरपुडा संपन्न झालेला असतो. (Paaru Serial Update)
त्यानंतर पारू व गणि बोलत असतात तेव्हा मारुती आता पारूच्या सगळं चांगलं होत आहे म्हणून गावाकडे ओटी भरण्यासाठी जाणार असतो त्यावर गणी मी सुद्धा जातो असं म्हणतो. मात्र पारू म्हणते की, नाही तू माझ्याबरोबर इथेच रहा मी खूप कमी दिवस आता इथे असणार आहे तू माझ्याबरोबर वेळ घालव. तेव्हा गणी पारूबरोबर राहायला तयार होतो. त्यानंतर इकडे घरी आदित्य त्या डोळ्यांच्या मागे लागलेला असतो, तेव्हा तो हरीशला सांगतो की काही झाले तरी हे डोळे शोधून काढायला हवे. तेव्हा प्रीतमही तिथे येतो. प्रीतम मुद्दाम आदित्यची फिरकी घेतो मात्र नंतर तिघे मिळून ते डोळे कोणाचे आहेत हे शोधू लागतात.
तर इकडे घरी अहिल्यादेवीने गुरुजींना बोलावलेलं असतं त्यांना आदित्यची पत्रिका दाखवायची असते. आदित्यची पत्रिका पाहिल्यानंतर त्याच वेळेला श्रीकांत पारूच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी पारूची पत्रिका ही मागून घेतो. आदित्यच्या लग्नासाठी पत्रिका बघतात तेव्हा गुरुजी सांगतात की, आदित्यची पत्रिका उत्तम आहे मात्र एक दोष आहे तो म्हणजे त्याची नवग्रहाची पूजा करावी लागेल. पारूची पत्रिका पाहिल्यावर ही गुरुजी असे सांगतात या मुलीच भविष्य उज्वल व भवितव्य आहे मात्र हिच्याही पत्रिकेत नवग्रह दोषाची पूजा आहे. त्यानंतर इकडे लगेचच दुसऱ्या दिवशी पूजेसाठी सगळेजण तयारी करू लागतात.
तर ही गोष्ट जेव्हा दिशाला समजते तेव्हा दिशा व दामिनी प्लान करतात आणि सांगतात की, ही पूजा दोघांनी एकत्र मिळून बाजू बाजूला बसून केली पाहिजे म्हणजे लोकांना आपण असं भासवू की या दोघांनी गुपचूप लग्न उरकले आणि लग्नाची पूजा करत आहेत. यावर दामिनी ही नवी चाल खेळण्यास तयार होते आता दिशा आणि दामिनीच्या या नव्या चालीमुळे किर्लोस्करांचं नावं धुळीला मिळणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.