‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर घरात सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा प्रीतमला ते जेवण आवडत नाही आणि तो म्हणतो की, या जेवणाला काही टेस्ट नाही आहे आणि हे रोजच्यासारखं जेवण नाही आहे. यावर अहिल्यादेवी त्याच्यावर रागावतात आणि सांगतात की, ही एका शेतकऱ्याची मेहनत आहे. ताटात आलेलं अन्न पूर्ण खायचं हे माझ्या घरात चालणार नाही, असं म्हणून त्याला चांगलीच अद्दल शिकवतात आणि तो जेवू लागतो. त्यानंतर खोलीत प्रीतम बसलेला असतो तेव्हा आदित्य प्रीतमच्या खोलीत येतो तेव्हा आदित्य प्रीतमची विचारपूस करतो आणि सांगतो की, तू असं का वागलास त्यात ते जेवण सावित्री आत्याने बनवलं होतं तिला किती वाईट वाटलं असेल. (Paaru Serial Update)
यावर प्रीतम सांगतो पण पारूचं काही चुकलं नाही हे कोणी समजूनच घेत नाही आहे आणि आईसुद्धा पारुला नीचा दाखवण्यासाठी असं वागत आहे. यावर आदित्य प्रीतमला शांत बसायला सांगतो. तर इकडे पारूसुद्धा जेवलेली नसते तेव्हा गनी पारूला ओरडतो आणि जेवायला सांगतो आणि स्वतः तिला जेवायला भरवतो. त्यानंतर इकडे आदित्यचा पायात अचानक कळा येऊ लागतात तेव्हा प्रीतम अहिल्यादेवींना सांगतो आणि अहिल्यादेवी दुसऱ्या दिवशी डॉक्टरला बोलवतात. डॉक्टर जेव्हा आदित्यच्या पायाला पायावर उपचार करण्यासाठी येतात तेव्हा ते आदित्यच्या पायाला लावलेला लेप पाहून म्हणतात, हा लेख कोणी लावला आहे?,
यावर दामिनी पुढे पुढे करत पारूने लावला आहे, हे चुकीचं असणार नक्की, तिला आम्ही सांगत होतो की, असं काही करु नको. अघोरी उपाय करु नकोस, डॉक्टरांना बोलावून घे, यावर डॉक्टर सांगतात की, असं काही नाही आहे तुम्ही तिला कौतुक करायला हवं असेल तर बोलवू शकता कारण हा लेप तिने उत्तम आणि योग्य प्रकारे लावला आहे. त्यामुळेच कदाचित आदित्य सरांना बरं वाटत असावं हे ऐकल्यावर मात्र दामिनीचा डावच तिच्यावर उलटतो. यावर दामिनी त्यानंतर डॉक्टर इथून निघून जातात आणि दामिनी सांगते की, लेप पारूकडून बांधून घ्यायची काहीच गरज नाही. आपण दुसऱ्या डॉक्टरांना सांगू त्यानंतर तिकडून सगळेजण निघून जातात तर डॉक्टरांना पारू बाहेर भेटते आणि आदित्यची, आदित्यच्या पायाची चौकशी करते तेव्हा डॉक्टर पारूचं कौतुक करत योग्य आणि उत्तम लेप लावलास आणि तू आयुर्वेद कुठून शिकली असं विचारतात. यावर पारू मी माझ्या गावाकडे शिकली माझे आजोबा हे वैद्य होते त्यांनीच मला हे शिकवलं असं सांगते. त्यानंतर पारू तिच्या घरात असते तेव्हा दामिनी नाटक करत धावत धावत पारूकडे येते आणि पारूसमोर पदरपासून म्हणते की आदित्यला तुझ्या लेपची गरज आहे तुझ्या लेपमुळे आदित्यला बरं वाटलं आहे. त्यामुळे तू लगेच मला लेप बनवून दे. यावर पारूलाही खरं वाटतं आणि ती लेप बनवायला जाते. तर त्यानंतर दामिनीच्या लक्षात येतं की पारू घरात आली नाही पाहिजे म्हणून ती सांगते की तू घरी येऊ नकोस तू मला इथेच लेप बनवून दे. यावर पारू विचारते का?, तेव्हा दामिनी सांगते की, अहिल्यादेवीनी तुला बंगल्यात येण्यास मनाई केली आहे.
हे ऐकल्यावर पारू शांतच होते. तर त्या मालिकेच्या पुढील भागात पारूकडून दामिनी लेप बनवून घेऊन येते आणि अहिल्या देवींना दाखवते आणि सांगते की, हा लेप देताना पारूने मला एक अट घातली आहे की, या घरात एकतर दिशा राहील नाहीतर मी आता अहिल्यादेवी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.