‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, हरीशला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरु असतो तर हरीशच लक्ष पारूने दिलेला त्या चिठ्ठीकडे लागून राहिलेलं असतं. तर दामिनी व दिशा ती चिठ्ठी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु करतात. दामिनी हरीशला हळद लावायला म्हणून पुढे जाते त्यावेळेला ती हरीशच्या हातातून चिठ्ठी काढून घेते. तेव्हा हरीश सांगतो ती इम्पॉर्टंट चिठ्ठी आहे मला हवी आहे. यावर दामिनी त्याला शांत करत कामाचीच असेल ना चिठ्ठी असं विचारते. आज तुझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण आहे त्यामुळे काम वगैरे राहू दे. हे सगळं झालं की तू माझ्याकडून येऊन ती चिठ्ठी पुन्हा परत घे, असं म्हणत ती चिठ्ठी घेऊन जाते. (Paaru Serial Update)
त्यानंतर सावित्री म्हणते आता काही झालं तरी पारू व हरीश सरांची भेट व्हायलाच हवी. त्यामुळे आता मलाच काहीतरी करायला हवं, असं म्हणत सावित्री किचनमध्ये जाते आणि हाताला लाल तिखट चोळून घेऊन येते आणि त्या हाताने ती हरीशला हळद लावते. त्यानंतर हरीशला हळद चुरचुरु लागते. तेव्हा हरीश तोंड धुवायला म्हणून खोलीत जातो तर इकडे येऊन सावित्री आत्या पारूला सांगते की, तुला मागच्या दरवाजाने हरीश सरांच्या खोलीत जायचं आहे. ते तुला तिकडेच भेटतील. यावर पारू सावित्रीला सांगते की, मी खूप वाईट आहे आपल्यामुळे हरीश सरांना खूप त्रास होत आहे, असं नको व्हायला हवं होतं. पण माझ्यापुढेही काहीच पर्याय नाही आहे असं म्हणत ती रडू लागते. तेव्हा सावित्री तिला धीर देते त्याच वेळेला सावित्री पारूच्या हातात गाठोड पाहते आणि विचारते तू हे गाठोड का घेतलं आहेस?, यावर पारू सांगते की, आज माझी आणि हरिश सरांची भेट झाली नाही तर मी हे घर सोडून जायचा निर्णय घेईन. आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. थोडे दिवस सर्वांना वाईट वाटेल पण नंतर सगळेजण विसरुन जातील की पारू नावाची एक मुलगी या घरात होती.
हरीशला भेटायला जाते त्यानंतर दिशा व दामिनीची चिट्ठी उघडून बघतात तेव्हा ती चिठ्ठी पूर्णतः हळदीनं माखलेली असते त्यामुळे त्यांना त्या चिठ्ठीवर काय लिहिलं आहे ते वाचतासुद्धा येत नाही. पारू हरीशला लपूनच भेटायला येते आणि सांगते की, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला माफ करा माझं लग्न झालं आहे. यावर हरीश तिला विचारतो की, तू काय बोलत आहेस तुला कळतंय का?, तुझं कोणाशी लग्न झालं आहे?. यावर पारू सांगते की तुम्ही माझ्याबरोबर लग्नाला बसणार म्हणून मी त्या ऍड शूटसाठी होकार दिला पण आयत्या वेळेला तुम्ही गायब झालात आणि त्यावेळेला तिथं आदित्य सर बसले.
आदित्य सरांनी स्वतः मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातले. हे ऐकल्यावर हरीशच्या पायाखालची जमीन सरकते. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दामिनी अहिल्यादेवींना येऊन सांगते की पारू घरात नाही आहे. ती कुठेतरी पळून गेली आहे. अहिल्यादेवीसमोर आता हे सगळं सत्य येणार का?, हरीश यावर आता काय निर्णय घेणारे हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.