रत्ना पाठक शाह ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाबरोबरच त्या त्यांच्या तल्लख बुद्धीसाठीही प्रसिद्ध आहेत. रत्ना बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहेत. या दिग्गज अभिनेत्रीने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, तिला एक वर्षापासून सिनेसृष्टीत कोणतंच काम मिळालेले नाही. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावताना अभिनेत्रीने सांगितले की, इन्स्टाग्रामच्या जमान्यात अनेकदा कलाकारांना सोशल मीडियावरील त्यांच्या फॉलोअर्सच्या आधारे भूमिका दिल्या जातात. (ratna shah statement)
‘ब्रुट’ला दिलेल्या मुलाखतीत रत्ना पाठक शाह यांना विचारण्यात आलं होतं की, कलाकारांच्या प्रतिभेपेक्षा दिसणं महत्त्वाचं आहे का?, यावर अभिनेत्री म्हणाली, “होय, आणि याचं उत्तर फक्त होय आहे”. अभिनेत्री म्हणाली, “यासाठी कलाकारांना कसे दोष द्यावे हे मला कळत नाही कारण या गोष्टी विचारल्या जातात आणि त्यावर लक्ष केंद्रित केले जाते”.अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी ऐकले आहे की आज लोकांना फॉलोअर्सच्या आधारे काम मिळत आहे. मी इन्स्टाग्रामवर नसल्यामुळे कामासाठी कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे कदाचित हे एक कारण असू शकते. मी आता एक वर्ष पूर्णपणे बेरोजगार आहे त्यामुळे या गोष्टींचा अर्थ खूप आहे. मी काय करू? एखाद्याला अभिनयाची कला शिकायची असेल तर तो कुठे जाणार?, त्यामुळे हे खरोखर कठीण आहे”.
रत्ना शाह नुकत्याच ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘मंथन’च्या टीमसह रेड कार्पेटवर थिरकताना दिसल्या. इतर स्टार्ससारखे महागडे पोशाख घालण्याऐवजी, रत्ना यांनी कान्समध्ये स्वतःची साडी नेसण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी खास हिमरू ब्लाउज आणि जॅकेटसह सुंदर पोशाख कॅरी केला. अभिनेत्रीचे पती अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाठक यांचा मुलगा प्रतीक बब्बरही यावेळी तिथे एकत्र होता.
व्यावसायिक आघाडीबद्दल बोलायचे तर, रत्ना पाठक शाह शेवटची २०२३ मध्ये तापसी पन्नू निर्मित ‘धक धक’ या रोड ट्रिप ड्रामामध्ये दिसली होती. या चित्रपटात त्याने दिया मिर्झा, फातिमा सना शेख आणि संजना सांघी यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ती सुप्रिया पाठकच्या कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर ‘सत्यप्रेम की कथा’ मध्येही तिने काम केले होते.