झी मराठी वाहिनीवर सध्या ‘नवरी मिळे हिटलर ला’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. ही मालिका संध्या रंजक वळणारवर पोहोचली असून मालिकेचा नायक अभिराम जहागिरदार व नायिका लीला या दोघांचाही साखरपुडा होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान या मालिकेच्या सेटवर सर्वत्र साखरपुड्याची तयारी सुरु असून सगळे जण छान नटून थटून दिसून आले. दरम्यान मालिकेमध्ये लीलाच्या आई म्हणजे कालिंदीची भूमिका साकारणाऱ्या शीतल क्षीरसागर यांनी मालिकेच्या सेटवरील वातावरणाबद्दल अनेक खुलासे त्यांनी केले आहेत. (sheetal kshirsagar on navri mile hitler la)
सध्या शीतल या ‘नवरी मिळे…’ या मालिकेमध्ये कालिंदी ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. या भूमिकेबद्दल त्यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या भूमिकेमध्ये दिलखुलासपणे भाष्य केले आहे. त्यांची ही भूमिका चाहत्यांना खूप आवडत आहे. या भूमिकेबद्दल त्या म्हणाल्या की, “मी गेल्या २२ वर्षांपासून मालिकांमध्ये काम करत आहे. झीबरोबर ही माझी पाचवी मालिका आहे. अनेक मालिकांमध्ये मला वेगवेगळ्या भूमिका करण्याच्या संधी मिळाल्या.आता मी यामध्ये एक नकारात्मक भूमिका करत आहे. माझ्याबरोबर असलेल्या कलाकरांबरोबर माझी चांगली गट्टी जमून आली आहे. पडद्यावर व पडद्यामागेही त्या माझ्या लाडक्या मुली आहेत”.
पुढे त्या म्हणाल्या की, “लीला व रेवती या दोघीही खऱ्या आयुष्यात ‘श्रावण क्वीन’ आहेत. तसेच आम्ही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणीदेखील झालो आहोत. त्यामुळे अनेकदा त्यांच्याशी बोलताना मला आई झाल्यासारखेच वाटते. खऱ्या आयुष्यात जरी आई झाले नसले तरीही या दोन मुली मला ‘झी वाहिनी’ने दिल्या आहेत. त्यामुळे मला रोज सेटवर यावसं वाटतं”.
दरम्यान कालिंदी, लीला व रेवती यांच्यामधील आंबट गोड नाते हे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. आता या मालिकेमध्ये अभिराम व लीलाचा साखरपुडा होणार का? काही विघ्न येणार की सुरळीतपणे पार पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.