काही प्रचंड गाजलेल्या मालिकांमध्ये झी मराठीची ‘उंच माझं झोका’ ही मालिका आजही लोकप्रिय आहे. इतर मलिकांच्या तुलनेत या मालिकेचे कथानक हे फार वेगळे होते. रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका १२ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तेव्हा ही मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली होती. मालिका पाहताना प्रेक्षक त्या काळात गेले असल्याच्या प्रतिक्रिया आजही येतात. मालिकेतले कलाकार, मालिकेचं शीर्षक गीत हे आजही लोकप्रिय आहेत. हेच या मालिकेचं यश आहे. (Virendra Pradhan On Facebook)
मात्र, सध्या हा ट्रेंड बदलला असून आता अश्या आशयघन मालिका पाहण्याला प्रेक्षक फारशी पसंती देत नसल्याचे दिसून येते. त्याचबरोबर एखादी मालिका टीआरपीच्या शर्यतेत मागे पडली तर ती मालिका बंद झाली असल्याचे चित्रही अनेकदा पाहायला मिळाले आहे. याबाबत प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाचा उल्लेख करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. विरेंद्र हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. या सोशल मीडियाद्वारे त्यांनी अनेकदा आपली मते परखडपणे मांडली आहेत. अशातच त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका फेसबुक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – “जो भी हैं सब तेरा…” स्वानंदी-आशिष यांनी एकेमकांसाठी गायले खास रोमॅंटिक गाणे, वडीलही रडू लागले अन्…
विरेंद्र यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “रणबीर कपूरने ‘अॅनिमल’च्या आधी खूप छान चित्रपट केले ते चालले नाहीत. फ्लॉप झाले. मग त्याने ‘अॅनिमल’ केला अन् सुपरहिट झाला. राज कपूरने ‘मेरा नाम जोकर’ केला. फ्लॉप झाला. मग त्याने बॉबी बनवला. सुपरहिट झाला. मी ‘उंच माझा झोका’, ‘स्वामिनी’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘यशोदा’ या मालिका केल्या नाही चालल्या. TRP रेसमध्ये) आता मी नवीन मालिका करत असून त्याची काही टायटल्स (शीर्षकनावे) रजिस्टर केली आहेत. “सून माझी अॅनिमल, सासू माझी अॅनिमल, सून सासूला चावत, रक्त पिपासू सासू” ही काही नावे आहेत. अजून काही छान नावे सुचली तर नक्की कळवा. टीआरपी छान येईल आणि भारताचं इकॉनॉमिक्ससुद्धा सुधारेल.”
आणखी वाचा – या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येणार हे नवीन चित्रपट आणि वेबसीरिज, पाहा संपूर्ण यादी
विरेंद्र यांनी त्यांच्या या फेसबुक पोस्टद्वारे सध्याच्या मालिकांचे विषय, टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांचे बदलले जाणारे कथानक, त्याचबरोबर प्रेक्षकांची मालिका बघण्याची बदलत जाणारी रुची यावर त्यांनी खोचकपणे भाष्य केले आहे. दरम्यान, विरेंद्र यआणि आजवर छोट्या पडद्यावरील ‘उंच माझा झोका’, ‘राधा ही बावरी’, ‘स्वामिनी’, ‘यशोदा’ या गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे