अभिनेता सिद्धार्थ चांदेकर एका विशेष कारणामुळे सध्या चर्चेत आला आहे. आजवर सिद्धार्थने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मिडियावरही सिद्धार्थ बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच सिद्धार्थने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीतील पुरस्कारांवरुन केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. सिद्धार्थने नुकतीच कॉकटेल स्टुडिओला मुलखात दिली. यावेळी बोलताना सिद्धार्थने अवॉर्ड्स विकले जातात का?, यावर भाष्य केलं. (Siddharth Chandekar On Awards)
“अवॉर्ड्स विकले जातात का?” असा प्रश्न सिद्धार्थला विचारण्यात आला. यावर उत्तर देत सिद्धार्थ म्हणाला, “आपल्याकडे तरी मला नाही वाटत की, पुरस्कार विकले जात असतील. आपण त्या लेव्हलला अजूनतरी नाही पोहोचलो आहोत आणि माझी इच्छा आहे की ती वेळ कधीच येऊ नये. मला या गोष्टी पटत नाही. मला सत्य परिस्थिती माहिती नाही. पण, अवार्ड्स निश्चितपणे विकले जात नाही”.
“अवार्ड्स विकले जात नाहीत पण, पक्षपात केला जातो हे मला नक्की माहिती आहे. जर का तुम्ही त्यावेळचे फेव्हरेट असाल तर तुम्ही काय काम केलं आहे हे पाहिलं जात नाही. अलीकडच्या काळात पुरस्कार सोहळ्याचं स्वरुप हुकलेलं आहे आणि ही गोष्ट आता प्रेक्षकांसह कलाकारांना सुद्धा माहिती आहे. याआधी जे अवॉर्ड फंक्शन व्हायचे…ते कार्यक्रम खूपच भारी असायचे. टीव्हीसमोर बसून असे सोहळे पाहावेसे वाटायचे किंवा नॉमिनेशन जाहीर झाल्यावर आपल्या मनात उत्सुकता निर्माण व्हायची. पण, आता ती उत्सुकता नाहीशी झाली आहे. आत प्रेक्षकांना माहित असतं की हा फेव्हरेट आहे आणि यालाच पुरस्कार देणार. पुरस्कार सोहळ्यांमधला सरप्राईज एलिमेंट आता हरवला आहे”, असं सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं.
“पक्षपातीपणा कोणामुळे होतो?” यावर सांगताना सिद्धार्थ म्हणाला, “पक्षपात हा एका गोष्टीपासून सुरु न होता तो एका माणसापासून सुरु होतो. जर या लोकांचा तू फेव्हरेट असशील तर, त्यांनी नियोजन केलेल्या सगळ्या कार्यक्रमांचा, त्या प्रेक्षकांचा तू फेव्हरेट राहणार. त्यामुळे पक्षपात होण्याची अनेक कारणं आहेत. मला माहिती आहे की एकेकाळी मी सुद्धा फेव्हरेट होऊन गेलो आहे आणि एकेकाळी मी नावडताही झालो आहे. जेव्हा मी फेव्हरेट होतो तेव्हा माझी एवढी काही काम लोकांपर्यंत पोहोचली नाहीत आणि जेव्हा मी इतर लोकांचा फेव्हरेट नव्हतो तेव्हा माझी चांगली काम बाहेर आली”. सिद्दार्थ पुढे म्हणाला, “परीक्षकसुद्धा निवडले जातात तेव्हा ते कोणाचे तरी आवडते आहेत म्हणून निवडले जातात. तीन परीक्षक विजेता ठरवतात. हे सगळे मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. वोट करुन विजेता सिलेक्ट करणं यावर माझा अजिबात विश्वास नाही. याउलट जर एक मोठं पॅनेल असेल जिथे सगळ्या क्षेत्रातील लोकांनी चर्चा करुन विजेता ठरवलं पाहिजे. वोटिंग या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही”.