Marathi Actor Death : मराठी सिनेविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाले असल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ४२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक रणजित पाटील यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचं समोर आलं. निधनानंतर तातडीने त्यांचे शव त्यांच्या मुळ गावी कोल्हापूर येथे नेण्यात आले. कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रणजित हे गेल्या काही वर्षांपासून मराठी मालिका, सिनेमा आणि नाटक विश्वात सक्रीय होते. सध्या रंगभूमीवर सुरु असलेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचं दिग्दर्शन रणजीत यांनी केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून तरुण कलाकारांनाही प्रोत्साहन दिलं. रणजित पाटील यांच्या निधनामुळे मराठी नाटक आणि एकांकिका स्पर्धांमधील आधारस्तंभ हरपल्याची भावना प्रत्येकाच्या नजरेत पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – नोरा फतेहीचा अपघात, मद्यधुंद चालकाला अटक, आता अभिनेत्रीची प्रकृती कशी? ‘तो’ व्हिडीओ समोर येताच व्हायरल
दिग्दर्शनाबरोबर रणजित यांनी ‘हृदयी प्रीत जागते’ या मालिकेत आपल्या अभिनयाची जादू दाखविली. त्यांच्या अंकल या भूमिकेचं भरभरुन कौतुक झालं. रणजित यांच्या निधनाने कलाकार आणि अनेक रंगकर्मी हळहळ व्यक्त करत आहेत.




