samir choughule arun kadam comedy : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील अनेक कलाकार हे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात. या कलाकारांपैकी महाराष्ट्राचे लाडके कलाकार म्हणजे अभिनेते अरुण कदम आणि अभिनेता समीर चौघुले. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत हे दोन कलाकार प्रेक्षकांचं मनभरून मनोरंजनकरत असतात. हास्यजत्रेतून ब्रेक घेऊन हे कलाकार काही काळ परदेश दौऱ्यासाठी गेले होते. परदेशातून परतल्यानंतर इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत समीर चौघुलेने सेटवरील सर्व कलाकरांबाबत मजेशीर पोलखोल केली आहे. यावेळी समीरने अरुण कदम यांचा एक मजेशीर किस्सा केला आहे.
मुलाखती दरम्यान समीरला सेटवर सगळ्यात जास्त फम्बल कोणाचे असतात असा प्रश्न विचारण्यात आला या बद्दल उत्तर देताना समीर म्हणाला “या मध्ये एकतर माझा समावेश होतो सगळ्यात जास्त फम्बल माझे होतात. कारण डोक्यात एकावेळी अनेक विचार सुरु असतात. पुढे समीर म्हणाला सेटवर आणखी एक व्यक्ती आहे ज्याचे सतत फम्बल पडत असतात ते म्हणजे अरुण कदम. समीर पुढे म्हणाला अरुण कदम चक्क एकदा स्वतःच नाव विसरले होते.(maharashtrachi hasya jatra)
हे देखील वाचा – प्रविण तरडेंची मोठी घोषणा, एसएस राजामौलींच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार, म्हणाले, “त्यांनी मला पाहिलं अन्…”
या व्यतिरिक सेटवर सगळ्यात जास्त वेळ स्क्रिप्ट विसरण हा प्रकार देखील अरुण कदम यांच्या सोबतच घडतो आस देखील समीर यावेळी म्हणाला. हास्यजत्रेत अनेक विषयांवर विविध स्कीट्स सादर केले जातात ज्यामधून हास्यनिर्मिती सोबतच समाज प्रबोधनाच देखील काम केल जात.(samir choughule arun kadam comedy)
हे देखील वाचा – “जन्मतः लेकीच्या हृदयात दोन छिद्र अन् तीन महिन्याची असताना…” अभिनेत्री बिपाशा बासूने सांगितला आयुष्यातील दुःखद प्रसंग
समीर आणि अरुण कदम हे आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अरुण कदम हे त्यांच्या विशिष्ट अभिनय शैली साठी ओळखले जातात. तसेच महाराष्ट्राचं हास्य जत्रा या कार्यक्रमात अनेक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना देखील पाहायला मिळतात. या कलाकारांचा सोशल मीडियावरही बराच फॅनबेस पाहायला मिळतो. (maharashtrachi hasya jatra 2023)