मालिका हे प्रेक्षकांच्या रोजच्या मनोरंजनाचं महत्वाचं माध्यम आहे. मालिका मोठ्या काळासाठी ठरलेल्या वेळेला रोज प्रक्षेपित होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अनेक रंजक वळण मालिकेत दाखवायला लागत असतात.सध्या अनेक मालिकांमध्ये नायक-नायिकांची लग्न सराई सुरु आहे.(Laganachi Bedi New Promo)
त्यातलंच नुकतंच पार पडलेलं लग्न म्हणजे, ‘लग्नाची बेडी’ या मालिकेतील राघव-सिंधूच लग्न. राघव-सिंधूच मालिकेत पुन्हा लग्न झालेलं पाहायला मिळत आहे. अनेक नाती या मालिकेत बदलत आहेत.राया आणि मधुराणीचं नातं नव्याने बहरताना दिसतं आहे.
पाहा मालिकेत कोणतं नवं वळण येणार? (Laganachi Bedi New Promo)
यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. कांताच्या येण्याने रत्नपारखी कुटुंबावर मोठं संकट आलं आहे.कांता राया वर गोळी झाडतो. त्यात रायाचा मुर्त्यू होतो. रायाच्या मृत्यूमुळे संपूर्ण रत्नपारखी कुटुंबावर आणि मधुराणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता कुठे मधुराणी आणि राया त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात करत होते. मधुराणी रायाच्या मृत्यूसाठी सिंधूला जबाबदार धरते आणि तिच्यावर हात उचलते.मधुराणीचा हा गैरसमज काय वळण घेणार हे बघणं रंजक ठरणार आहे.(Laganachi Bedi New Promo)
कालच्या भागात आपण पाहिलं राघव आणि सिंधूच लग्न पार पडत.परंतु दुसरीकडे कांता रायावर हल्ला करतो, हि गोष्ट घरी समजते, आणि राघव,सिंधू आणि मधुराणी तिकडे पोहचतात, तोपर्यंत कांता रायावर गोळी झाडतो.आणि तिकडून निसटून जातो.रायाची ही अवस्था बघून राघव,सिंधू आणि मधुराणीला मोठा धक्का बसतो. राया राघव कडून वचन घेतो, कि रायच्या मागे तो त्याची बहीण सिंधू, त्याची आई आणि मधुराणीच्या काळजी घेईल. तो सिंधूची साथ कधी ही सोडणार नाही.सिंधूने राघवसाठी खास बनवलेली अंगठी तो राघवला देतो शेवटचं एकदा मधुराणीला बघतो आणि अखेरचा श्वास घेतो.
हे देखील वाचा : प्रथमेशच्या पहिल्या केळवणाचा थाट आणि खास उखाणा