बॉलिवूडमध्ये कलाकार, दिग्दर्शकांमधील वाद काही नवीन नाहीत. असाच वाद अभिनेता कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यात निर्माण झाला होता. कार्तिकने करणच्या चित्रपटाला नकार दिल्यामुळे दोघांमध्ये बराच वाद रंगला. जान्हवी कपूरच्या ‘दोस्ताना २’ चित्रपटातून कार्तिकने माघार घेतल्यामुळे कार्तिक व करणमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचं बोललं गेलं. पण, सध्या करणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात करणने कार्तिकबाबत वक्तव्य केलं आहे. या व्हिडिओवरून त्यांच्यामधील वाद मिटला असल्याचं दिसत आहे. (Karan Johar on Kartik’s Wedding)
इंडियन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न २०२३मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी करण व आर्यनही उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान करण कार्तिकच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. करणचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
वाचा – अर्जुनच्या लग्नाबाबत काय बोलला करण? (Karan Johar on Kartik’s Wedding)
या व्हिडीओमध्ये करण त्याच्या लग्नाबाबत बोलत आहे.
करण म्हणाला, “ यंग सुपरस्टार कार्तिक आर्यनबद्दल काय सांगावं… मला खात्री आहे की तो २०२३च्या अखेरपर्यंत विवाहबंधनात अडकेल. त्याचा लग्नसोहळा विशेष लक्षवेधी असेल” असं म्हणत त्याने कार्तिकच्या लग्नाबाबत भाष्य केलं. पुढे करणने त्याला एका चाहतीने प्रपोज केल्याचंही म्हटलं.
तो म्हणाला, “मेलबर्नमध्येच एका चाहत्याने त्याला लग्नासाठी प्रपोज केलं आहे. इतकंच नाही तर तिनं कार्तिकच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाचंही कौतुक केलं आहे. चित्रपटाने सगळ्यांना भावुक केलं असल्याचंही तिने सांगितलं”. करणने त्याच्या ‘दोस्ताना-२’ चित्रपटासाठी कार्तिकला घेतलं होतं. या चित्रपटात त्याच्यासह जान्हवी कपूर दिसणार होती. पण कार्तिकने चित्रपटासाठी मोठी रक्कम मागितली आणि कथेमध्ये काही बदल करण्यास सांगितले होते. ते करणला अजिबात आवडले नसल्यामुळे त्याने नकार दिला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकने हा चित्रपट सोडल्यामुळे करणच्या चित्रपटाला २० कोटींचं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या कारणामुळे दोघांमध्ये निर्माण झालेला ताण पुर्णपणे ओसरला असल्याचं दिसत आहे.