woman protest for pani puri : सोशल मीडियावर आजकाल ट्रेंडिंग रील व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. असे अनेकदा व्हायरल रील पाहून हसू आवरत नाही, तर बरेचदा नव्याने काहीतरी शिकायला मिळतं. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणार एका स्त्रीचा व्हिडीओ पाहून हसावे की रडावे कळत नाही. माझ्यावर अन्याय झाला असं म्हणत तिने भररस्त्यात थैमान घातलं. आता या महिलेवरील अन्याय ऐकाल तर तुम्हालाही हसू अनावर होणार नाही. गुजरातच्या वडोदरा परिसरात एका महिलेने थेट रस्त्यावर बसून आंदोलन केलं. वीस रुपयांत सहा ऐवजी चारचं पाणीपुरी दिल्या या एकाच गोष्टीने गुजरातचे रस्ते ठप्प झाले.
ऐकून नवलंच वाटलं. वडोदरामधील सुरसागर परिसरातील ही घडलेली घटना अनेकांना हसवून गेली. एका स्त्रीने थेट पाणीपुरी वाल्याने पाणीपुरी कमी दिली म्हणून तांडव केला आणि भररस्त्यात ती रडत बसली. याने नेमकं काय झालं हे पाहायला गर्दी जमा झाली आणि रस्तेही इतके ब्लॉक झाले की, ट्राफिकने सगळंच ठप्प झालं. वाहतूक कोंडीने सगळ्यांचीच तारांबळ झाली. यावेळी पोलिसांनी संबंधित महिलेची समजूत घातली.
आणखी वाचा – दुकानं बंद केली, चाहते रस्त्यावरच रडू लागले आणि…; गायक झुबीन गर्गच्या निधनाने आसाम कोलमडलं, व्हिडीओ समोर
A woman went to have panipuri but was served 4 instead of 6 for ₹20.
— Kumar Manish (@kumarmanish9) September 19, 2025
She objected, sat down on the road in protest, and even broke into tears.
The twist? Kudos to Vadodara Police for stepping in and resolving this pani-filled crisis swiftly!pic.twitter.com/37DYZAOMkd
पोलिसांशी बोलताना सदर महिनेले सांगितले की, पाणीपुरीवाला नेहमीच कमी पाणीपुरी देतो, तसेच त्याला काही बोलल्यास माजही दाखवतो. महिलेच्या तक्रारीनंतर वडोदरा महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर तक्रारीवरुन आम्ही पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करु शकत नाहीत. यासाठी अन्न सुरक्षा विभागाकडून त्याच्या खाद्यपदार्थांची तपासणी करावी लागेल.
सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर नेटकऱ्यांनी गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दोन पाणीपुरीसाठी सत्याग्रह करायला लागला, असं गमतीत एकाने म्हटले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “पाणीपुरीसाठी चाहत्यांचा उत्साह एकदम भारी आहे. आपण गुजरात सरकारकडून याचं उत्तर मागितलं पाहिजे”, असं म्हटलं आहे. तर एकाने, “या महिलेनं न्यायालयात गेलं पाहिजे. कारण आजकाल न्यायालय विचित्र वाटणाऱ्या प्रकरणातही न्याय देत आहे”, असं म्हटलं.





