‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली. मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. रणदिवे कुटुंबाभोवती फिरणार या मालिकेचं कथानक आहे. या मालिकेत कुटुंबातील माणसांचं नातं पाहायला मिळत आहे. या नात्यांना मायेने बांधणारी माणसं, आलेल्या संकटाना एकत्र उभे राहत दिलेला लढा सर्व काही मालिकेत पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत ऐश्वर्या व सारंग यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली. (Gharoghari Matichya Chuli Promo)
एकामागोमाग मालिकेत अनेक रंजक वळणे आलेली पाहायला मिळाली. मालिकेत ऐश्वर्याला सार्थकबरोबर लग्न करायचं असतं. मात्र सार्थकची योग्यवेळी सुटका झाल्याने तो पळून जातो आणि ऐश्वर्याला सारंगबरोबर लग्न करावं लागतं. सारंग बरोबर केलेलं लग्न हे ऐश्वर्याला काही पटत नाही. ऐश्वर्या रणदिवे कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी सारंगशी लग्न करण्याचा निर्णय घेते. आणि याची सुरुवात तिला जानकीपासून करायची असते. जानकीच्या हातात घराची सूत्र असल्याने ती सगळी सूत्र ऐश्वर्याला स्वतःच्या हातात घ्यायची असतात.
लग्नांनंतर ऐश्वर्या जेव्हा घरात येते तेव्हा सारंगची आई जानकीसमोर दुःख व्यक्त करते. ऐश्वर्या या घरात रुळेल का?, असं म्हणत ऐश्वर्याच वागणं हे उथळ पाण्याला खळखळाट फार असल्याचं सांगते. आणि जानकीला सांगते की, तू नीट सर्व तिला समजावून सांग. यावर जानकी विचार करते की, आता मी ऐश्वर्याला समजावेन, शिकवेन तिची शिकण्याची इच्छा हवी ना. त्यानंतर इकडे ऐश्वर्याला सगळे जेवण करायला सांगतात. ऐश्वर्या कधी किचनमध्येही गेलेली नसल्याने तिला जेवण करायला येत नाही. तेव्हा ती बाहेरून ऑर्डर करते.
अशातच मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये ऐश्वर्याचा खोटेपणा समोर आलेला पाहायला मिळत आहे. सारंगची आई जेवण जेवते, तेव्हा त्यांना ठसका लागतो,. तेव्हा घरातील सगळीच मंडळी त्यांची काळजी करु लागतात. त्यानंतर ऐश्वर्या बाहेर येऊन फोनवर बोलत असते तेव्हा जानकी तिथे येते. आणि बोलते तुझी आमटी आईंच्या जीवावर बेतली ऐश्वर्या. कारण ती तू बाहेरुन मागवली होतीस. यावर ऐश्वर्या, नाही मी स्वतः इतकंच बोलते त्यावर जानकी तिला हॉटेलच बिल दाखवते. आणि सांगते, इथून पुढे जर खोटारडेपणा केलास तर याद राख, गाठ माझ्याशी आहे”, असं बोलते. ऐश्वर्याचा खोटेपणा जानकीसमोर आल्याने आता जानकी ऐश्वर्याला अद्दल घडवणार का?, की ऐश्वर्या याचा बदल घेत आणखी कोणती नवी चाल आखणार, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.