Star Pravah New Update : मराठी मालिकाविश्वात सध्या टीआरपीसाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. अनेक नव्या मालिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळणं कठीण ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील थ्रिलर मालिका ‘काजळमाया’ संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी ही मालिका अवघ्या दोन महिन्यांतच निरोप घेणार आहे. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झालेल्या ‘काजळमाया’मध्ये अभिनेता अक्षय केळकर, रुची जाईल आणि वैष्णवी कल्याणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुरुवातीला रात्री साडे दहाच्या वेळेत सुरू झालेल्या या मालिकेची वेळ टीआरपी अभावी बदलून रात्री अकराची करण्यात आली. मात्र वेळ बदलूनही अपेक्षित प्रेक्षक संख्या मिळू न शकल्याने अखेर वाहिनीने मालिकेला ऑफ एअर करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘स्टार प्रवाह’ने अधिकृतपणे जाहीर केल्याप्रमाणे ११ जानेवारी रोजी ‘काजळमाया’चा अंतिम भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेत चेटकीण वंशातील ‘पर्णिका’ या रहस्यमय असलेल्या पात्राची कथा मांडण्यात आली होती. अंतिम भागाच्या प्रोमोमध्ये पर्णिका आणि कनकदत्ताचा कायमचा अंत दाखवण्यात येणार असल्याची झलक शेअर करण्यात आली आहे. यामुळे मालिकेचा शेवट निर्णायक आणि थरारक असणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
आणखी वाचा – ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रेग्नेंट?; लवकरच आनंदाची बातमी देणार, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मालिका इतक्या कमी कालावधीत संपणार असल्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आता कुठे कथा रंगात आली होती”, “ही मालिका इतकी लवकर का बंद केली?”, “कधी सुरू झाली कधी संपली कळलंच नाही”. ‘काजळमाया’ने अचानक घेतलेला निरोप हा प्रेक्षकांसाठी अनपेक्षित ठरला आहे.
आणखी वाचा – विकी-कतरिनाने जाहीर केलं लेकाचं नाव; वडिलांच्या ‘या’ चित्रपटाशी खास कनेक्शन, फोटो समोर




