choreographer geeta kapur quits bollywood : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गीता कपूरने आता बॉलिवूड विश्वाला रामराम केला आहे. याबाबत तिने एका मुलाखतीत भाष्य करत या निर्णयामागचं कारण सांगितले आहे. गीताने सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांनी फराह खानला ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘दिल तो पागल है’ सारख्या चित्रपटांच्या गाण्यांमध्ये मदत केली. गेल्या कित्येक वर्षांपासून ती टीव्हीवर नृत्य रिऍलिटीमध्ये परीक्षक म्हणून काम पाहत होती. गीता कपूरने सांगितले की तिचा यापुढे बॉलिवूडमध्ये परत येण्याचा काहीच हेतू नाही. गीता यांच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत गीता कपूरला विचारले गेले की, “आपण बॉलिवूडमध्ये परत कधी येत आहात? वेळ पूर्ण झाला, खूप ब्रेक घेतला. आता परत या”. तर गीता म्हणाली, “नाही. मला असे वाटते की प्रत्येक व्यक्तीने एक पाऊल मागे घ्यावे आणि नवीन प्रतिभेला पुढे जाण्याची संधी द्यावी”. गीता पुढे म्हणाली, “आता इतरांना पुढे जाण्याची आणि चमकण्याची वेळ आली आहे. आम्हाला या उद्योगातून जितके मिळायचं होतं तितकं आणि मला जितके काम, पैसा आणि कीर्तीच्या बाबतीत आशीर्वाद हवे होते तितके मला मिळाले आहेत असं वाटतं. परंतु असं क्वचित घडू शकतं की, जिथे माझी आवड मला ते करण्यास भाग पाडत आहे असे मला वाटत असेल तर मी ही संधी जाऊ देऊ देणार नाही, मी ती संधी गमावणार नाही”.
गीता कपूर म्हणाली की यावेळी उद्योगविश्वात बरेच काम आहे आणि अशा परिस्थितीत बाकीच्यांना संधी दिली पाहिजे. ती म्हणाली, “याक्षणी कामाचा अभाव आहे. काम मिळणं कठीण झालं आहे. आजकाल इतके चित्रपटही तयार केले जात नाहीत, जसे आमच्या वेळेस केले जात होते. जिथे ८ ते १० गाणी होती. मोठी गाणी असायची. नृत्य गाणी आयोजित केली गेली. म्हणून अशा कमी कामात आम्ही संघर्ष देखील करतो आणि इतर लोकांना संधी देत नाही. मग त्यांना ते करु द्या. मी कुठे आहे तिथे मी आनंदी आहे”.
गीता कपूर यांनी असेही सांगितले की तिला कोणत्याही निर्बंधात काम करायचे नाही. तिला सर्जनशीलता कार्य करायचे आहे, कॉपी-पेस्ट नाही. गीता कपूरच्या कारकीर्दीबद्दल बोलताना तिने वयाच्या १७व्या वर्षी कामाला सुरुवात केली. त्यानंतर ते फराह खानच्या गटात सामील झाले. त्यांनी ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘दिल तो पागल है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मोहबत्ते’, ‘कल हो ना हो’, ‘मैं हूं ना’ आणि ‘ओम शांती ओम’ याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये फराहला मदत केली. गीता कपूर फराहला आईचे स्थान देते आणि तिला तिचा गुरु देखील मानते.





